शबनम न्यूज | मावळ (दि.०२ डिसेंबर) :- मावळ तालुक्यामध्ये काल झालेल्या अतिवृष्टी व कडाक्याच्या थंडीमुळे तालुक्यात नवलाख उंबरे,पिंपळोली,मळवंडी ढोरे व ब्राम्हणोली(पमा) या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या मेंढपाळांच्या 175 मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे व 50 ते 60 मेंढ्या ह्या सिरियस आहेत.
सभापती बाबुराव वायकर यांनी नवलाख उंबरे येथे पाहणी करण्यास गेले असता तिथली परिस्थिती खूपच भयानक व दुःखद होती,एकाच कळपातील 50 ते 55 मेंढ्या ह्या एकाच ठिकाणी मृत्युमुखी पडलेल्या पाहून स्वतः सभापती आप्पा वायकर यांनी माणुसकी धर्म जपत वयक्तिक तात्काळ 25000 रुपयांची रोख मदत दिली.
तसेच,सभापती कृषी व पशुसंवर्धन मा.बाबुराव आप्पा वायकर यांनी तालुका पशुधन अधिकारी-डॉ.देशपांडे, A-BDO-संताजी जाधव यांच्या समवेत तालुक्यातील इतर नुकसानग्रस्त व मृत्युमुखी पडलेल्या ठिकाणी भेट देऊन मेंढपाळ व त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांना धिर दिला व पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद पुणे यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लवकर मदत होईल अशी ग्वाही मेंढपाळ शेतकऱ्यांना दिली.