शबनम न्यूज | मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने आज औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्षपदी शरीफउद्दीन ख्वाजा यांची निवड करण्यात आली. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी शरीफउद्दीन ख्वाजा यांचे सहकार्य राहील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
यासोबतच बाळासाहेब नायकवडी यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. बाळासाहेब नायकवडी हे पक्षाची ध्येय-धोरणे सर्वासामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घेतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस मुश्ताक अहमद, माजी आ. भाऊसाहेब चिकटगावकर, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, युवक उपाध्यक्ष अमोल मातेले, शहर उपाध्यक्ष मोहम्मद हबीब, माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे उपस्थित होते.