शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०६ जानेवारी) :- रास्त भाव रेशनिंग दुकानदारांना मोफतचे धान्य शासनामार्फत वेळेत देण्यात यावे व शासनामार्फत धान्य देण्यास विलंब झालेल्या धान्य वाटपास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी विजय वाघमारे साहेब, प्रधान सचिव, अन्न ,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, ऑल महाराष्ट्र रेशनींग शाॅपकीपर फेडरेशनच्या वतीने व अध्यक्ष या नात्याने मी आपणास विनंती करू इच्छितो की, महाराष्ट्र मध्ये कोरोना वाढत आहे, राज्यातील गोरगरिबांना लाभार्थ्यांची उपासमार होऊ नये यासाठी शासनाने महाराष्ट्रामध्ये मार्च 2022 पर्यंत मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय झाला आहे परंतु असे असले तरी रास्त भाव रेशनिंग दुकानदारांना वेळेमध्ये धान्य शासनामार्फत भेटत नाही यामुळे लाभार्थी वंचित राहत आहे , तसेच यामुळे रास्त भाव रेशनिंग दुकानदारांनाही लाभार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
आज आपण जर पाहिले तर डिसेंबरचे धान्य सुद्धा अजून मिळाले नाही, तसेच जानेवारीचेहि धान्य आले नाही, तरी हे धान्य एकदम दिल्यास रास्तभाव दुकानदारयांना वाटप करणे खूप जिकरीचे जाणार आहे व हे काम खूप वेळखाऊ आहे याचाही विचार शासनाने केला पाहिजे म्हणून ऑल महाराष्ट्र रेशनिंग शाॅपकीपर फेडरेशनच्या वतीने मी आपणास विनंती करतो की लवकरात लवकर धान्य रास्त भाव दुकानदारांना देण्यात यावे तसेच त्यांना डिसेंबर महिन्यातील धान्य वाटपासाठी 31 जानेवारीपर्यंतची मुदतवाढ देण्यात यावी.
त्याच बरोबर आपण जर वास्तविकता पाहिली महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये रास्तभाव रेशनिंग दुकानदार यांनी वाटप केलेल्या धान्याचे पैसे शासनाने मंजूर करूनही डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर, एफ डी ओ, तहसीलदार यांच्याकडून रास्त भाव दुकानदार यांच्यापर्यंत वेळेत पोहोचत नाहीत याचीही आपण चौकशी करावी तसेच दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कायदेशीररीत्या कारवाई करावी, असे ही सदर निवेदनात माजी खासदार गजानन बाबर यांनी नमूद केले आहे.