शबनम न्यूज : वृत्तसंस्था (दि.०८ फेब्रुवारी) :- नववर्षात मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमायक्रॉनने धुमाकुळ घातला होता. त्यामुळे पुन्हा निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्येत दररोज घट होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेने या महिन्याच्या अखेरीस शहरातील निर्बंध कमी करण्याचा आणि शहर अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली आहे.
“मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या महिन्याच्या अखेरीस मुंबई अनलॉक होईल. मुंबईतील निर्बंध हटवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. परंतु लोकांनी मास्क घालणं आणि सुरक्षित अंतर पाळणं बंधनकारक असेल,” असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
There is good news for Mumbaikars. Mumbai will be unlocked by the end of this month. We have made up our minds, but it is essential for the people to wear masks and observe social distancing: Mumbai Mayor Kishori Pednekar#Maharashtra pic.twitter.com/YVekcJcqUY
Advertisement— ANI (@ANI) February 8, 2022