शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०४ मार्च) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचा भ्रष्ट हुकूमशाही कारभार सुरू आहे. या प्रकरणी अटक झालेल्या स्थायी समिती अध्यक्षावर भाजपने कोणतीही कारवाई केली नाही उलट त्याचे समर्थन केले व हे शहराचे दुर्दैव असून भाजप पदाधिकारी व भ्रष्टाचाराला साथ देतात हे स्पष्ट होते. महासभेत विचारण्यासाठीचे लेखी प्रश्न महापौरांकडून प्रश्न स्वीकारले जात नव्हते. भाजपच्या हुकुमशाही भ्रष्ट कारभाराला कंटाळून भाजप नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याचे माया बारणे यांनी सांगितले.
माया बारणे यांनी आज शुक्रवारी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे भाजप नगरसेवक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राजीनामा देण्यामागची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. बारणे म्हणाल्या, महापालिकेच्या नागरवस्ती विभागांतर्गत महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी नियुक्त केलेल्या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था या ठेकेदार एजन्सीने भाजप पदाधिकारी आणि प्रशासनाच्या मदतीने २०२०-२१ व्या वर्षात ५७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. भाजप अधिकाऱ्यांच्या दबावामुळे त्यावर कारवाई होत नाही. भ्रष्टाचाराला भाजपचे समर्थन आहे. भूमिपुत्रांना भाजपमध्ये न्याय मिळाला नाही. लोकहिताच्या निर्णयावर सभागृहात बोलू दिले नाही.
महासभेत विचारण्यासाठीचे लेखी प्रश्न महापौरांकडून स्वीकारले जात नव्हती. हुकूमशाही पद्धतीने कारभार केला. शहरातील भाजपच्या नेतृत्वाला त्यांची हुजरेगिरी करणारे नगरसेवक पाहिजे होते. स्वावलंबी जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे नगरसेवक भाजपला नको होते. २०१७ पासूनच चुकीच्या प्रकरणा विरोधात बोलू दिले जात नव्हते. त्यात वेस्ट टू एनर्जी प्रकल्प स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचार, शहरात होत असलेला अनियमित पाणीपुरवठा, भामा आसखेड धरणातील पाणी शहराला देण्याचे आलेले अपयश, पिंपरी-चिंचवड शहराच्या उर्वरित ४० टक्के भागासाठी १०६ कोटी दिले तरी सुद्धा २४ टक्के पाणी पुरवठा केला नाही, शहरात टँकर माफियांना पोहोचण्यासाठी केलेले कृत्रिम पाणी टंचाई,कोरोना काळात दिलेली वैद्यकीय बीले, शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी केलेली अनधिकृत बांधकामे अशा विविध मुद्द्यांवर वारंवार आवाज उठविला.ते भाजप नेतृत्वाला रुचत नव्हते, तक्रारींची दखल घेतली नाही. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत असताना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी पाठिंबा दिला नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिका आशिया खंडात श्रीमंत असलेली नावलौकिक अशी महानगरपालिकेची प्रतिमा होती भाजपच्या राजवटीत श्रीमंत महापालिका भ्रष्टाचारी महापालिका म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. त्यामुळे शहराची बदनामी होत आहे. महापालिका इतिहासात स्थायी समितीच्या सभा चालू असताना एसीबीने छापा टाकला लाच प्रकरणी अटक झालेल्या स्थायी समिती अध्यक्षा वर कोणतीही कारवाई केली नाही, उलट त्याचे समर्थन केले हे शहराचे दुर्दैव आहे असेही बारणे म्हणाल्या.
यावेळी नगरसेवक कैलास बारणे, अभय मांढरे, सचिन बारणे, ऋषिकेश काशीद, विराज बारणे आदी उपस्थित होते.