पिंपरी चिंचवड –
मुस्लिम धर्मीय मशिदीवरील भोंगे संदर्भात राज ठाकरे यांनी परत एकदा राज्यशासनाला अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरे हे जाणून-बुजून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. असा आरोप पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदार संघातील युवा नेते शाहनवाज शेख यांनी केला आहे.
युवा नेते शहानवाज शेख यांनी २०१९ मध्ये भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे व माजी आमदार विलास लांडे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने लढविली होती व या निवडणुकीत त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त मते मिळाली होती व त्यांनी या मतांद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अस्तित्व संपत आले असताना आपल्या पक्षाला कसे तरी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांच्या वतीने होत आहे असा टोला ही युवानेते शाहनवाज शेख यांनी लगावला आहे .
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीन सभा घेतल्या व या तीनही सभेत त्यांनी मुस्लिम धर्मीय विरोधात नागरिकांना भडकविण्याचे काम केले आहे, मशिदीवरील भोंगे उतरविण्यासाठी त्यांनी राज्य शासनाला अल्टिमेटम दिला परंतु मशिदीवरील भोंगे हे ,किंवा कोणत्याही धार्मिक स्थळावरील भोंगे हे शासनाची परवानगी घेऊनच लावण्यात आलेले असतात तसेच या भोंग्याचा आवाज किती असावा याला ही शासनाच्या नियमात तरतूद असते आणि त्या तरतुदी नुसारच प्रत्येक धार्मिक स्थळावर भोंगे लावलेले असतात असे असतानाही फक्त आणि फक्त धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठीच राज ठाकरे यांनी हा मशिदीवरील भोंगे याचा विषय ताणून धरला आहे.
आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी तसेच आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी व भारतीय जनता पार्टीशी जवळीक साधण्यासाठी राज ठाकरे हे ही खेळी खेळत असल्याचे शाहनवाज शेख यांनी सांगितले.
सध्या महाराष्ट्रात किंवा आपल्या देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे, त्याचप्रमाणे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे, पेट्रोल डिझेल घरगुती गॅस यांची दरवाढ अपेक्षेपेक्षा जास्त होत असताना या सर्व गोष्टींकडे कानाडोळा करून राज ठाकरे एका वेगळ्याच विषयावर राज्य शासनाला अल्टिमेटम देत आहेत ही खूपच निंदनीय बाब आहे.
तसेच राजकीय सूडापोटी महाराष्ट्रात दंगल घडविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शाहनवाज शेख यांनी केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून राज ठाकरे हे अनेक चांगले विषय देऊ शकले असते परंतु त्यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारे विषय घेतला असल्याने राज्यात असंतोष मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचे ही शाहनवाज शेख यांनी सांगितले.
आपण आत्ताच कुठे कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीतून बाहेर येत आहोत मागील दोन वर्षापासून कोरोना विषाणूने संपूर्ण देशाला अडचणीत आणले होते या काळात आपले अनेक बंधू-भगिनी कोरोना मुळे मृत पावले , या कठीण काळात कोण हिंदू कोण मुस्लिम
अशा धर्माकडे कोणाचेही लक्ष गेले नाही उलट या काळात प्रत्येक माणूस प्रत्येक नागरिक हा प्रत्येक माणसाला प्रत्येक नागरिकांना मदत करीत होता. या काळात कोणालाही आपला धर्म आठवला नाही सर्व या अडचणीच्या काळात एकमेकांना मदत करीत होते, मग आत्ताच का? ……हा विषय राज ठाकरे यांनी घ्यायला हवा होता का?.,.. असाही सवाल शाहनवाज शेख यांनी केला आहे.