शबनम न्युज | मुंबई
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या प्रकरणात गेल्या बारा दिवसापासून तुरुंगात असलेले खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना आज अखेर न्यायालयाने जामीन दिला आहे. जामीनावर सुटका करताना न्यायालयाने अटी व शर्तींवर जामीन दिला. तुरुंगातून सुटल्यानंतर नवनीत राणा व रवी राणा हे समाज माध्यमांवर कोणतेही वाद-विवाद वक्तव्य करणार नाही, तसेच परत असा गुन्हा करणार नाही व असा गुन्हा केल्यास त्यांना परत अटकेला सामोरे जावे लागणार आहे. तसेच चौकशीसाठी जेव्हा मुंबई पोलीस त्यांना हजर राहण्यास सांगतील तेव्हा त्यांना हजर राहावे लागेल, या अटींवर खासदार नवनीत राणा व रवी राणा यांना न्यायालयाने जामीन दिला आहे.
Advertisement