शबनम न्युज | पुणे (वृत्तसंस्था)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर महाराष्ट्रात त्रिपक्षीय सरकार आल्याचा प्रयोग पाहून आनंद झाला असता, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. शनिवारी ‘महाराष्ट्र कनेक्ट कॉन्क्लेव्ह २०२२’ या मुलाखतीदरम्यान त्यांनी माहिती दिली.
त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार संजय पवार म्हणाले, “खासगी भेटींमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, शरद पवार आणि त्यांच्या पक्षाने शिवसेनेशी हातमिळवणी केली तर महाराष्ट्रापुढे दिल्ली झुकेल. त्यामुळे तीन पक्षांच्या युतीमुळे शिवसेनाप्रमुख खूश झाले असते, असे मला वाटते. जोपर्यंत शरद पवार पुढाकार घेत नाहीत, तोपर्यंत केंद्रातील भाजप सरकारला पर्याय मिळणार नाही, असे राऊत म्हणाले.सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर भाजप आज जे करत आहे ते करण्याची हिंमत झाली नसती.
पवार म्हणाले कि, “जेव्हा तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आले तेव्हा ते टिकणार नाही, असे भाकीत अनेकांनी केले. काहींनी सांगितले की ते १५ दिवस, तीन महिने किंवा सहा महिने टिकेल. मात्र सरकारला आता अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्रिपक्षीय आघाडी सरकार योग्य दिशेने वाटचाल करत आहे. लोकांनी आता अंदाज बांधणे बंद केले आहे.”
राऊत म्हणाले की, मविआ सरकार सत्तेवर येण्यापूर्वी सेना भाजपशी चर्चा करत होती. “आम्हाला माहित होते की ते त्यांच्या शब्दावर राहणार नाहीत. म्हणून, आम्ही मविआ सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आम्हाला माहित होते की शरद पवार बदल घडवून आणण्यास सक्षम आहेत.