शबनम न्युज | मुंबई
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्या नंतर २ दिवसांपासून राजकारणात खळबळ सुरु आहे. शिंदेंसोबत सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहटीमध्ये थांबले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.
एकाही आमदाराने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको असं म्हटलं तर आज संध्याकाळी मी वर्षाहून मातोश्रीला मुक्काम हलवतो, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मुख्यमंत्री आपल्या वर्षा या निवासस्थानाहून मातोश्रीकडे गेले. यावेळी वर्षा बंगल्याबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली असून घोषणाबाजी सुरू आहे.
#WATCH Maharashtra CM Uddhav Thackeray arrives at his family home 'Matoshree' after leaving CM residence, in Mumbai
Hundreds of Shiv Sena workers gather outside 'Matoshree' to express their support pic.twitter.com/XGrVhsbNFb
— ANI (@ANI) June 22, 2022
Advertisement