शबनम न्युज | मुंबई
राज्यात शिवसेनेचे नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदेंसोबत सर्व बंडखोर आमदार सध्या गुवाहटीमध्ये थांबले आहेत.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच फेसबूक लाइव्हद्वारे आपली भूमिका मांडली आहे. संबंधित भाषणातून त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करत राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली आहे. उद्धव ठाकरे यांच्या या भाषणानंतर एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे यांनी ट्विट करून गेल्या अडीच वर्षात घडलेल्या चार मुद्द्यांच्या आधारे त्यांनी बोलले आहे. ते म्हणाले कि, “गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा केवळ घटक पक्षांना झाला. यामध्ये शिवसैनिक भरडला गेला. एकीकडे घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत गेलं,” असं त्यांनी म्हटलं आहे.