शबनम न्युज | मुंबई
“धनुष्यबाण शिवसेनेचा आहे आणि तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. धनुष्यबाण हे जरी निवडणूक चिन्ह असलं तरी ते हाती घेतलेल्या लोकांचीही चिन्हं लोक लक्षात घेतात. माणसांना बघून लोक मतदान करत असतात. त्यामुळे मी जे बोललो त्याचा अर्थ नवीन चिन्हाचा विचार करा असा अजिबात नाही. धनुष्यबाण कधीच कुणी शिवसेनेकडून हिरावून घेऊ शकत नाही”, असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत म्हंटले आहे.
धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेपासून कोणीच हिरावून घेऊन शकत नाही..
Advertisement– शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
— Shivsena Communication (@ShivsenaComms) July 8, 2022
ठाकरे म्हणाले कि, एक आमदार गेला म्हणून पक्ष संपला का ? आमदार जाऊ शकतात पक्ष जाऊ शकत नाही. हा एक संभ्रम तयार केला जात आहे म्हणून लोकांना सांगत आहे यावर विश्वास ठेवू नका. विधीमंडळ पक्ष वेगळा आणि नोंदणीकृत पक्ष वेगळा. धनुष्यबाण बाबत कोणीही मनात संभ्रम ठेवू नका. ते १५-१६ आमदार विधीमंडळात आमच्याबरोबर राहीले आहे त्यांचे मला कौतुक आहे. अशी जिगरीची माणसे जिथे असतात तिथे विजय हमखास असतो. माझा न्याय मंदिरावर विश्वास आहे, न्यायदेवतेवर विश्वास आहे. लोकशाहीचे अस्तित्व किती मजबूत रहाणार आहे, देशाच्या पुढच्या वाटचालीला दिशा दाखवणारा उद्याचा निकाल असणार आहे.
आमदार जाऊ शकतो पक्ष जाऊ शकत नाही..
अनेक संभ्रम निर्माण केले जात आहे, जनतेने आणि शिवसैनिकांनी अजिबात या भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका.– शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे
Advertisement— Shivsena Communication (@ShivsenaComms) July 8, 2022
आज केलं तेच अडीच वर्षापूर्वी झालं असतं ते आता घातपाताने का केलं, जी गोष्ट सन्मानाने केली असती ती खर्च करुन आता का करत आहांत ? विधानसभेची निवडणुक घ्या.निवडणुक झाली पाहिजे. आम्ही जर चुकलो असू तर जनता जो निर्णय घेईल तो मान्य असेल. सन्मानाने बोलवावं असं यापूर्वीही आवाहन केलं आहे. जर त्यांना मिठी मारुन आनंद मिळत असेल तर तो आनंद तुम्हाला लखलाभ लाभो. असेही ठाकरेंनी यावेळी सांगितले.
आमच्याबद्दलचं प्रेम हे अडीच वर्ष कुठे गेले होते. जे आमच्याशी अत्यंत वाईट पद्धतीने वागले त्यांना मिठ्या मारताना तुम्हाला आनंद वाटत असेल तर, तुमचा आनंद तुम्हाला लखलाभ असो..
मी सर्वसामान्य शिवसैनिकांसोबत आहे..
– शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे— Shivsena Communication (@ShivsenaComms) July 8, 2022
पुढे ते म्हणाले कि, आता काही जण बोलत आहांत कि सन्मानाने बोलवलं तर मातोश्रीवर जाऊ. या लोकांना मातोश्रीवर प्रेम आहे याबद्दल त्यांचे आभार मानतो, धन्य झालो. मात्र जेव्हा आमच्यावर- ठाकरे कुटुंबियांवर-मातोश्रीवर टीका करत होतो, विकृत टीका करत होते तेव्हा याच लोकांची दातखिळ बसली होती. आता टीका करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून हीच लोकं बसले आहेत तेव्हा हे प्रेम खरे की खोटे आहे ? शिवसेनेने एवढी पदे दिल्यावर असे का वागले? असा प्रश्न ही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे.