शबनम न्युज | पुणे
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या बन्सी-रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. समाज घडवणाऱ्या जैन धर्मातील महनीय व्यक्तींना बन्सी-रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्टतर्फे दरवर्षी ‘बन्सी-रत्न आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’, ‘समाजशिरोमणी’, ‘समाजभूषण’, ‘समाजरत्न’, ‘मानवसेवा’ पुरस्कार प्रदान करण्यात येतात. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप असते.
या पुरस्कारांसोबतच जैन, गुजराती, माहेश्वरी, अगरवाल समाजातील दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षणातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येतो. या वर्षीपासून सर्व समाजातील दहावी-बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षणातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांना आपल्या करिअरच्या, तसेच जीवनाच्या योग्य वाटा दाखविण्यासाठी हा कार्यक्रम महत्वपूर्ण असतो, असे सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी स्पष्ट केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “पात्र विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे प्रमाणपत्र, सुवर्ण पदक आणि मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आणि गुणपत्रक सादर करावेत. www.suryadatta.org या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला गुणवंत विद्यार्थी सन्मान अर्ज (मेरिटोरियस स्टुडन्ट फेलिसिटेशन फॉर्म) भरणे व विद्यार्थ्यांनी गौरव समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित असणे आवश्यक आहे. अत्यंत नावाजलेल्या या कार्यक्रमाकरिता ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष एम. एस. बिट्टा, प्रख्यात योगगुरु डॉ. संप्रसाद विनोद, प्रख्यात अभिनेता श्री रझा मुराद, प्रख्यात आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, विख्यात उद्योगपती आणि समाजसेवक श्री विठ्ठल मणियार, प्रसिद्ध लेखक आणि पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया डॉ. ज्ञानेश्वर मुळे, भजनसम्राट पदमश्री अनुप जलोटा, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे, प्रख्यात अभिनेत्री श्रीमती सोनाली कुलकर्णी, विपश्यना केंद्र पुणेचे अध्यक्ष डॉ. दता कोहिनकर, तसेच उद्योजक अविनाशजी चोरडिया इत्यादी मान्यवरांनी प्रमुख पाहुणे तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली आहे.
“जैन समाजातील पुरस्कारांसाठी इच्छुक व्यक्तींनी ‘आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’, ‘समाज शिरोमणी’, ‘समाजभूषण’, ‘समाजरत्न’, ‘मानवसेवा’ पुरस्कारासाठी अर्ज पाठवावेत. आपली स्वतःची माहिती, परिचयपत्र, फोटो, आजवरच्या उल्लेखनीय गोष्टी, आधी मिळालेले पुरस्कार आदी माहिती, कोणत्या पुरस्कारासाठी अर्ज पाठवत आहात त्याचा उल्लेख करून support@suryadatta.edu.in यावर पाठवावे. अधिक माहितीसाठी ८९५६९३२४००, ८३८००३८९७४ किंवा ८६०५८५७५५५ या क्रमांकांवर संपर्क करावा. सत्कार समिती आलेल्या अर्जाची छाननी करून योग्य व्यक्तींची निवड करेल. सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख २२ सप्टेंबर २०२२ अशी असून हा सत्कार समारंभ सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, बावधन पुणे येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी www.suryadatta.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, अशी माहिती बन्सी-रत्न चॅरिटेबल वेलफेअर ट्रस्टच्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया व सचिव सिद्धांत चोरडिया यांनी दिली.
यंदा पुरस्काराचे पाचवे वर्ष आहे. यापूर्वी पुढील प्रतिष्ठित व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार (श्रीमती सुदर्शनाजी आणि श्री दीपचंदजी पारख, श्रीमती प्रतिभाजी आणि श्री शामजी जाजू, श्रीमती शांताबाईजी आणि श्री बिर्दीचंदजी नवलखा, श्रीमती प्रमिलाबाईजी आणि श्री नौपतलालजी साकला, श्रीमती चंचलाजी आणि श्री मोतीलालजी सुराणा), समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार (माताजी कमल देवी कर्नावट, श्रीमती नीताजी संजय घोडावत, श्रीमती सुशिलाजी ईश्वरदासजी बंब), समाजशिरोमणी राष्ट्रीय पुरस्कार (श्री रामलालजी सिंघवी, श्री विजयकांतजी कोठारी, प्रा डॉ अशोककुमारजी पगारिया), मानवसेवा राष्ट्रीय पुरस्कार (श्री विलासजी राठोड, श्रीमती भारती विजय भंडारी, डॉ रसिकजी शेठीया), समाजभूषण राष्ट्रीय पुरस्कार (श्री ओमप्रकाशजी रांका, श्री पृथ्वीराजजी धोका, श्री महावीरजी नहार) यांचा समावेश आहे, असे त्यांनी नमूद केले.
गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अवाश्यक पात्रता - - शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये १० वी किंवा १२ वी परीक्षा (कोणतेही शासनमान्य बोर्ड) ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण -शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये पदवी परीक्षा (कला, वाणिज्य व विज्ञान शाखा) ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण - शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये फार्मसी, इंजिनीरिंग, आर्किटेक्चर व तत्सम ४ वर्षाचे पदवी अभ्यासक्रम ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण - शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये पी एचडी उत्तीर्ण - शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय महत्वाच्या शैक्षणिक संस्थेमध्ये (उदा. आयआयटी, आयआयएम, शासनमान्य महाविद्यालयात एमबीबीएस, एमडी इत्यादी) निवड व प्रवेश - शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये सीए, सीएस, आयसीडब्ल्यूए इत्यादी परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण - शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्रतिष्ठित परदेशी विद्यापीठात प्रवेश.
या पुरस्कारांसाठी आवश्यक वयोमर्यादा - - आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार - वय वर्षे ८० किंवा अधिक - समाज शिरोमणी पुरस्कार – वय वर्षे ६० ते ७० किंवा राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य - समाजभूषण पुरस्कार – वय वर्षे ६० ते ७० किंवा राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य - समाजरत्न पुरस्कार – वय वर्षे ५० किंवा अधिक (महिला) - मानवसेवा पुरस्कार - वय वर्षे ३५ किंवा अधिक