शबनम न्युज | अहमदनगर
भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार मारुतरव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने यांचे वतीने दि.०२ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान स्वछता महिना आयोजित करण्यात आलेला आहे. संस्थेचे अध्यक्ष मा.आ.डॉ.नरेंद्र घुले, मा.आ.चंद्रशेखर घुले, सचिव अनिल शेवाळे व प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्यामसुंदर कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वछता महिनाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
स्वच्छ भारत हा केंद्र सरकारचा अत्यंत महत्वकांक्षी कार्यक्रम आहे. यानुसार दि. ०२ ते १९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने केव्हिके प्रक्षेत्र दहिगाव-ने, राक्षी, नेवासा, शहरटाकळी, करंजी, सौंदळा, महालक्ष्मी हिवरा, मोरगव्हाण या गावांमध्ये स्वछतेचे कार्यक्रम घेतलेले आहेत. यामध्ये वर्मी कंपोस्ट वापरून सूक्ष्मजीव आधारित कृषी कचरा व्यवस्थापन, स्वच्छता विषयी जनजागृती कार्यक्रम, पीक अवशेष व्यवस्थापन, कचरा आणि संपत्तीवर तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक, शेतकऱ्यांसह गावांची स्वच्छता कार्यक्रम, स्वच्छता या विषयांवर शालेय मुलांचे मार्गदर्शन व कार्यालये आणि परिसर स्वच्छ करून वेळेवर विल्हेवाट लावणे इ. अश्या विविध वर शेतकरी पुरुष व महिला तसेच शालेय विद्यार्थी यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी केव्हिके चे शास्त्रज्ञ माणिक लाखे, नारायण निबे, सचिन बडधे, नंदकिशोर दहातोंडे, इंजि.राहुल पाटील, प्रकाश बहिरट, प्रकाश हिंगे, अनिल देशमुख, प्रवीण देशमुख व इतर कर्मचार्यांनी सहभाग नोंदविला.