शबनम न्युज | मुंबई
दिवाळीच्या निमित्ताने राज्यात १०० रुपयात शिधावाटप करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती मात्र अजूनही शिधावाटपावर सरकारकडून स्पष्टता झालेली नाही. राज्य सरकारने उत्साहात केलेली घोषणा ही केवळ प्रतिमा सुधारण्यासाठी करण्यात आली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर केली.
तसेच सरकारकडे पैशाची व्यवस्था झाली नसावी त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवली असेल. सरकारकडे अजूनही चार दिवस आहेत. त्याआधी शिधावाटपाला सुरुवात करावी. शिधावाटपाची घोषणा दिवाळीच्या आधी करूनही अद्यापही सरकारने त्याबाबत तजवीज केलेली नाही. यातून सरकारची अकार्यक्षमता लोकांपुढे आली आहे, असे मत प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केले.
Advertisement