‘काम दिलसे करोगे तो पैसा जरूर मिल जायेगा’
शबनम न्युज | मुंबई (वृत्तसंस्था)
आज हिंदी चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या सर्वोकृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणजे पंकज त्रिपाठी. रन (२००४), मध्ये डोळे मिचकवण्याची भूमिका साकारण्यापासून ते मिर्जापुर, लुडो, कागज आणि क्रिमिनल जस्टीस यांसारख्या मेनस्ट्रीम प्रोजेक्टचे हेडलाईन बनणारे अभिनेते ठरले. नुकतेच भारताच्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा दरम्यान (IFFI) मध्ये पंकज त्रिपाठी यांनी आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलताना, कोणताही गॉडफादर नसताना आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचण्याचे कारण सांगितले.
ते म्हणाले, मी एका अतिशय साध्या कुटुंबातून आलो. मी अशा खेडेगावातून आहे जिथे आम्हाला विजेची मूलभूत सुविधा मिळावी म्हणून संघर्ष करावा लागला. पण आम्ही आनंदी होतो. मी अभिनयाच्या जगापासून खूप दूर राहत होतो आणि आता माझे संपूर्ण आयुष्य अभिनयात आहे. सिनेमाबद्दलचे प्रेम सेंद्रिय पद्धतीने विकसित झाले. मी माझ्या गावी नाटकं बघायचो.. तेव्हाच मला रंगभूमीची आवड निर्माण झाली आणि मग मी दिल्लीला गेलो आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये प्रवेश घेतला. काही वर्षांनी मी स्वप्नांच्या नगरी मुंबईला आलो आणि तेव्हापासून मी सिनेमाची कला शिकत आहे आणि पडद्यावर अभिनयाद्वारे माझे कौशल्य दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रवास मी पाहिलेला स्वप्नांच्या पलीकडे आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, एखाद्याने त्याची मूळं कधीच विसरता कामा नये, जर तुम्ही तुमची मूळं विसरलात तर जगणं कठीण होऊन बसतं. व्यक्ती असो, कथा असो, वनस्पती असो, या जगात प्रत्येक गोष्ट मूळं आहे. आज मी जे काही आहे ते माझ्या मुळांमुळे आहे. असे पंकज त्रिपाठी म्हणाले.
पंकज त्रिपाठी यांच्याकडे अनेक तरुण महत्वकांशी कलाकार आदर्श म्हणून पाहतात. त्या सर्वांसाठी त्रिपाठी यांनी एक मोलाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले, फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी अभिनयात येऊ नये, प्रथम तुम्हाला चित्रपट उद्योगात का यायचे आहे? ते समजून घ्या. तुमचे प्रेम, तुमच्या गरजा समजून घ्या. ‘काम दिलसे करोगे तो पैसा जरूर मिल जायेगा’ अशा शब्दात त्रिपाठी यांनी सोनेरी सल्ला शेअर केला.
पुढे त्रिपाठी यांना पहिल्यांदा अभिनयातून सतराशे रुपयांचा चेक एका संक्षिप्त टीव्ही कार्यकाळासाठी मिळाला असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. अभिनेते त्रिपाठी यांनी अतिशय संघर्ष करून ही वेळ आणलेली आहे. तसेच फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी अभिनय करू नये, अभिनयात यायचे तर पहिल्यांदा का यायचे? हे तुम्ही समजून घ्या, असे मत अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी व्यक्त केले.