लेखिका : सौ.प्रतिमा अरुण काळे
” तिळगुळ घ्या गोड- गोड बोला” असे म्हणत कोणताही भेदभाव न करत सर्वांना मोठ्या आनंदाने तीळगूळ देवून साजरा होणारा सण म्हणजे मकर संक्रांती होय.भोगी,संक्रांत,क्रिंकात असे तीन दिवस चालणारा हा सर्वात महत्त्वाचा सण.मकरसंक्रांती हा सण गेग्रियन कॅलेंडर नुसार जानेवारी महिन्यातील १४ किंवा १५ तारखेला येतो किंवा मराठी काल दिनदर्शिकेनुसार पौष महिन्यात येणारा शेती संबंधित तसेच सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे.भारतीय संस्कृती ही कृषीप्रधान संस्कृती आहे.या दिवसांमध्ये शेतात आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना मातीच्या बोळक्या( सुडगे)मध्ये स्त्रिया एकमेकींना देतात.त्यात हरबरे,ऊस,बोरे,गव्हाच्या ओंब्या,तीळ अशा रब्बी हंगामातील येणाऱ्या गोष्टी सुगडात भरून देतात,त्याप्रसंगी बायका सुंदर-सुंदर उखाणेही घेतात.
एक सांगावेसे वाटते,नको त्या क्रूर प्रथा काही लोकांनी थोपवल्या आहेत त्या थांबवल्या पाहिजेत.पती नसलेल्या महिलेचा इतर पती असलेल्या महिला जो अपमान करतात किंवा…सारखा सौभाग्यवती,विधवा असा उल्लेख करून जी हिन वागणूक दिली जाते..ती दूर झाली पाहिजे.हा सण साजरा करण्यामागे हेतू असा आहे की प्रेम,स्नेह,माया,ममता द्यावी..तर मग नको त्या रूढी परंपरेनुसार अपमान करणे,कुंकू लावले न लावणे असे अपमान करणे संपूर्ण माणूस म्हणून टाळावे…जे माणूस नसतील ते अशी कृत्य करतील…त्याला नाईलाज.कारण ते माणूसच नाही….त्यामुळे माणुसकीची अपेक्षा त्यांच्याकडून करणे संपूर्ण चुकीचे.हा केवळ सौभाग्यवतीचा सण या नावाने साजरा न करता, माणुसकीचा,प्रेमाचा सण आहे… आणि तो त्याच पद्धतीने साजरा व्हावा असे प्रामाणिकपणे वाटते.कुंकू लावणाऱ्या महिलेचा जर पती मृत पावत नसता तर …आपण या क्रूर प्रथा पाळाव्यात.पण आपल्याला माहिती जन्म मृत्यू प्रत्येकाला अटळ आहे..अन् ते कोणाच्याही हातात नाही…आधी कोणाचा मृत्यू होईल कोणीही सांगू शकत नाही.ज्याचा जोडीदार जातो ते त्यालाच माहिती असते.पत्नी आधी देवाघरी गेली तर त्याचा वियोग मग पुरुषाला होत नाही का?त्याला काहीच फरक पडत नाही का त्याची पत्नी / जोडीदार त्याला सोडून गेली याचा.नाही,त्याला ही तितकाच त्रास होतो..जोडीदाराचा वियोग काय असतो तो त्यालाच समजेल ज्याचा जोडीदार गेला….मग अशा अमानुष प्रथा का पाळाव्यात.जोडीदार गेला म्हणून त्याला किती जपले पाहिजे..त्या व्यक्तीला फक्त तुमच्याकडून मानसिक आधाराची गरज असते पण,तुम्ही लोक तो ही साधा देवू शकत नसेल तर कोणत्या अर्थी तुम्हाला माणूस म्हणावे…सौभाग्यवती हा शब्द च खोडला गेला पाहिजे…तो शब्द जो पर्यंत आहे तो पर्यंत ही विषमतेची,अस्पृश्यतेची दरी कायम असणार.प्रत्येकांनी दोन भुवईच्या दरम्यान कुंकू (पाण्यात खलवलेले) कुंकू लावणे गरजेचे असते तर मग ते कुंकू लावण्याचा अधिकार ..पती नसलेल्या महिलेला का नाही…लग्न न झालेल्या मुलीला तो अधिकार आहे..तर तो अधिकार प्रत्येक महिलेला असलाच पाहिजे..कारण ती ही मानव आहे..अशी बंधने महीलांसाठीच का?पुरुषांसाठी असे एखादे तरी बंधन आहे का ते सांगा?…म्हणून असे अमानुष बंधने सोडून द्या…कुंकू लावण्याने मोठेपणा मिरवला जातो असेही नाही…पण,कोणताच भेदभाव व्हायला नको.त्याने तुम्ही त्या महिलेचे मानसिक खच्चीकरण करतात..तुमचा पती जिवंत आहे म्हणजे तुम्ही खूप कमावले असेही नाही..त्याच्या आधी तुम्ही,किंवा तुमच्या आधी तो कधी ना कधी जाणारच,हे तर प्रत्येकजण मान्य करणारच ना?
आजच्या २१ व्या शतकात शिक्षिका,इंजिनियर,डॉक्टर,उच्च पदवी घेतलेल्या महिला ही हा भेदाभेव करतात याचे ही विशेष वाटते..त्यांच्या बुध्दीची कीव येते.त्या इतक्या विषमता पाळतात,अस्पृश्यता हीच तर झाली आजच्या युगातील.त्यांनी मोठा तिर नाही मारला हे ही त्यांना समजत नाही.त्यांना याच्या अर्थे सजीवांना जन्म मृत्यू असतो हेच समजले नाही? ते सजीवांचे एक मुख्य लक्षण आहे..अमर कोणीही नाही..देवाचा देव ही अमर नाही..पूर्वी ज्यांना आपण देव देवी,दानव मानत होतो त्यात मग काय सगळे पुरुष देव, दानव त्यांच्या बायकांच्या/ पत्नीच्या आधी गेलेत का?एक ही देवी अशी कुंकू नसलेली दाखवत नाही.ब्राम्हणशाही अन् त्यांना साथ देणारे आपल्यातील ९९.९९% महिलाच आहे.त्यांना हे ही समजत नाही अशी वेळ आपल्यावर,आपल्या बहिणीवर,लेकिवर,आईवर,सूनेवर कोणावरही येवू शकेल.मग,असे जे दृष्ट भेद आपण करतो ते कितपत योग्य आहे? जो बोलतो/ जी बोलते..आवाज उठवतात त्यांना नावे ठेवतात,त्यांच्या नावाने खडे फोडले जातात.अरे,इतके तरी जाणा शास्त्र काय सांगते?…प्रत्येकाने कुंकू लावावे तर ते लावावे.यातून आपण पती – पत्नी हे नाते श्रेष्ठ करण्याचा नको तो अमानुष प्रयत्न करतो…मग आई अन् बाप या नात्याला शून्य किमंत राहते.दुसरी आई किंवा बाप परत आपल्या आयुष्यात आपल्याला मिळत नाही हे लक्षात घ्या…अन् अशी बंधने घालण्याचे बंद करावीत.
महाराष्ट्रात या सणाला मकर संक्रांती,आसाममध्ये माघ, बिहू,पंजाबमध्ये माघी,हिमाचल प्रदेशात माघी साजी,जम्मूमध्ये माघी संग्रांद किंवा उत्तरायण,हरियाणामध्ये सक्रत,राजस्थानमध्ये सकरत,मध्य भारतात सुकरात,पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जातात. तामिळनाडूमध्ये उत्तरायण,गुजरात आणि उत्तर प्रदेश,उत्तराखंडमध्ये घुघुटी, बिहारमध्ये दही चुरा,ओडिशामध्ये मकर संक्रांती,कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा,पश्चिम बंगाल(ज्याला पौष संक्रांती देखील म्हणतात),उत्तर प्रदेश(खिचडी संक्रांती देखील म्हणतात),उत्तराखंड (ज्याला उत्तरायणी देखील म्हणतात)किंवा सोप्या भाषेत,आंध्रप्रदेश आणि तेलंगणामधील संक्रांती,माघे संक्रांती (नेपाळ),सोंगक्रान (थायलंड),थिंगयान(म्यानमार),मोहन सोंगक्रान(कंबोडिया),आणि शिशूर सेनक्राथ(काश्मीर).पश्चिमबंगालमध्ये मोकोर सोनक्रांती,नेपाळमध्ये माघे संक्रांती म्हणून ओळखली जाते.येथे ‘संक्रांती’ म्हणजे ‘हस्तांतरण’,हा दिवस सूर्याचा मकर राशीत संक्रमण दिवस मानला जातो.आता हिंदू दिनदर्शिकेमध्ये सूर्य उत्तरेकडे सरकतो.सूर्य या देवतेला समर्पित,अनेक स्थानिक बहु-दिवसीय उत्सव संपूर्ण भारतात आयोजित केले जातात.ग्रेगोरियन/ इंग्रजी दिनदर्शिकेनुसार जानेवारी महिन्याशी सुसंगत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस दरवर्षी साजरा केला जातो. सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा तो पहिला दिवस आहे.
मकर संक्रांती सामाजिक सण जसे की रंगीबेरंगी सजावट,ग्रामीण मुलांनी घरोघरी जाणे,गाणी गाणे आणि काही भागात भेटवस्तू मागणे,मेळे,नृत्य,पतंग उडवणे,बोनफायर आणि मेजवानी यांसारख्या सामाजिक उत्सवांनी साजरी केली जाते.अनेक निरीक्षक पवित्र नद्या किंवा तलावांवर जातात आणि सूर्याला धन्यवाद देण्यासाठी स्नान करतात.दर बारा वर्षांनी,हिंदू कुंभमेळ्यासह मकर संक्रांत पाळतात.जगातील सर्वात मोठ्या सामूहिक तीर्थक्षेत्रांपैकी एक,अंदाजे ६० ते १००दशलक्ष लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात.या कार्यक्रमात,ते सूर्याला प्रार्थना करतात आणि गंगा आणि यमुना नदीच्या प्रयागराज संगमावर स्नान करतात.
मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो.सूर्याचे उत्तरायण आधीच म्हणजे२१-२२ डिसेंबरलाच सुरू झालेले असते.अर्थातच त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरूच असते.पृथ्वीवरून पाहिले असता,२१-२२ डिसेंबरपासून सूर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.
महाभारतात कुरु वंशाचे संरक्षक भीष्म हे बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पहात पडून होते.त्यांना इच्छामरणाचे वरदान होते.ज्या दिवशी उत्तरायण सुरू झाले त्यादिवशी त्यांनी प्राणत्याग केला.भारतीय परंपरेत उत्तरायणाचा काळ दक्षिणायनापेक्षा अधिक शुभ मानला जातो.
संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रतिवर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते अशी समजूत प्रचलित आहे.कधी तिचे वाहन हत्ती,कधी गाढव तर कधी डुक्कर असते.मात्र यामागे नेमका काय कार्यकारणभाव आहे हे मात्र कोठेही नोंदविलेले दिसून येत नाही.
संंक्रांंतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावाने साजरा होतो.या रब्बी हंगामात उपलब्ध सर्व शेंंगाभाज्या, फळभाज्या यांंची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी,तीळ लावलेली बाजरीची भाकरी,लोणी अणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात.संंक्रांंतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व असते.
भोगी(सामान्यतः१४ जाने) संक्रांत (सामान्यतः१५ जाने) व किंक्रांत (सामान्यतः१६ जाने) येते.संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना आणि लहान मुलांना तिळगुळ (तिळाचे लाडू,वड्या किंवा तिळाचा हलवा) आणि स्त्रियांना वाण वाटून ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभकामना दिली जाते.विवाहित स्त्रिया या दिवशी आणि या दिवसापासून हळदी-कुंकू करतात.रथसप्तमी हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो.मराठी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी आवर्जून काळी साडी नेसतात,कारण काळा रंग सर्वात जास्त उष्णता शोषतो.
संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे,हा काळ थंडीचा असतो.त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खातात.तसेच बाजरीची भाकरी,लोणी,मुगाची खिचडी,वांगी,सोलाणे,पावटे,गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात.तीळ वापरण्यातला दुसरा अर्थ सिग्धता.स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात.स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू.तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाण घेवाण करायची,स्नेह वाढवायचा,नवीन स्नेहसंबंध जोडायचे.जुने असलेले समृद्ध करायचे,तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे हा कार्यक्रम असतो.
नवविवाहित वधूचे हळदीकुंंकू विवाहानंंतरच्या प्रथम संंक्रांंतीला करण्याची प्रथा आहे.तिला यासाठी काळी साडी भेट दिली जाते.हलव्याचे दागिने मुलीला व जावयालाही देऊन त्यांंचे कौतुक केले जाते.लहान बालकांंनाही संंक्रांंतीनिमित्त काळ्या रंंगाचे कपडे घालणे व त्यांना हलव्याचे दागिने घालणे अश्या पद्धती दिसून येतात.चुरमुरे,बोरे, हरभरे,ऊसाचे तुकडे,हलवा असे मिश्रण लहान मुलांंच्या डोक्यावर ओततात. अलीकडे यामधे गोळ्या,छोटी बिस्किटे,पैसे,चॉकलेट घालण्याची हौसही दिसते.याला बोरन्हाण अथवा लूट असे म्हणतात.बालकांच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरन्हाण केले जाते.
मकरसंक्रांतीच्या दिवशी कलकत्ता शहरानजीक गंगानदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते त्या गंगासागर नावाच्या ठिकाणी गंगासागर यात्रा आयोजित केली जाते.हिमालयातील देवप्रयाग,मुनी की रेती,कीर्तिनगर, व्यासघाट या ठिकाणी संक्रातीच्या निमित्ताने मेळे भारतात.या दिवशी केरळमधील शबरीमला डोंगरावर मकरज्योतीचे दर्शन घेण्यास अनेक भाविकांची गर्दी होते.
मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात.भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो.या दिवशी सकाळी आपले घर, घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो.दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात.महिला नवीन अलंकार धारण करतात.सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात.दुपारी जेवणाचा बेतही खास भोगीचा असतो. तीळ लावलेल्या भाकऱ्या,लोणी,पापड, वांग्याचे भरीत,चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत असतो.प्रथम या पदार्थाचा देवाला नैवेद्य दाखवून सर्वजण एकत्र जेवायला बसतात.वांग्या-बटाट्याच्या जोडीला हिरवागार घेवडा,पापडी,हरबऱ्याचे हिरवेगार दाणे,कोनफळ,लालचुटुक गाजरे,भुईमुगाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शेंगा यांच्या भेसळभाजीला भोगीची भाजी म्हणतात.
मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात,त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो)आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान,रक्तदान,वस्त्रदान,अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा.यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदूळ वाहतात.
मकर संक्रांतीचा सण हा स्नेहवर्धनाचा सण असतो.मकर संक्रांतीच्या दिवसापासून उत्तरायणारंभापासून (२२ डिसेंबरपासून)मोठे घालेले दिनमान जाणून लागते.पूर्वी इलेक्ट्रिीसिटी नव्हती. त्या वेळी माणसे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच कामे करावयाची. दिनमान वाढत जाणार म्हणजे अधिक काम करायची संधी मिळणार!म्हणून मकर संक्रांतीचा सण हा आनंदाचा सण म्हणून साजरा केला जातो.थंडीच्या दिवसात तीळ हे अधिक आरोग्यदायी असतात.’ फरगीविह ॲन्ड फरगेट’ हा संदेश या सणाद्वारे दिला जातो.जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला जातो.
संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रात म्हणून साजरा करतात.संक्रांतीदेवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुरा नावाच्या राक्षसाला ठार मारले.आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले.म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो.पंचागात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला असतो.हा दिवस शुभकार्याला घेतला जात नाही.या दिवशीही स्त्रिया हळदीकुंकू समारंभा साजरा करतात.
असा हा स्नेहाचा सुगंध देणारा सण आहे,त्याचे पावित्र्य माणुसकी नात्याने सर्वांनी राखावे…समानतेचे मूल्य सर्वांनी जपावे.अस्पृश्यता,विषमता,भेदाभेद दरी कायमची मिटावी…सौभाग्यवती नावाचे लेबल काढून माणुसकीचे लेबल त्याला जोडावे.विधुर शब्दाचा प्रयोग करताना कधी जाणवत नाही .पुरुषांच्या बाबतीत जी माणुसकी दाखवली जाते ती महिलांच्या बाबतीत ही दाखवावी..आपण माणूस आहोत याची पावती स्वतः ने च स्वतः ला दिली तरी खऱ्या अर्थी मकरसंक्रांत हा सण साजरा केल्याचा आनंद तुम्हाला घेता येईल अन् देता येईल.भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झालीत ..पण,अजून ही भारतात हे विषमतेचे खतपाणी घालणारे कोणी पुरुष नसून महिलाच आहे हे ही तितकेच विषारी सत्य आहे.त्यांना माणूस जन्माचा अर्थच अजून उमगला नाही?? अन् त्यात एक शिक्षिका,साहित्यिक…यांचा वाटा सर्वात महत्वाचा आहे..त्यांनी विषमता दूर केली तर नक्कीच हे होवू शकेल? त्यासाठी कोणी अहिल्या जन्मावी याची वाट पाहण्यात अर्थ नाही ..एकच अहिल्या माता माझी होवून गेली..तिने अजून एक पावूल पुढे जावून हे पावूल उचलले असते तर ही विषमता कधीच दूर झाली असती..त्यासाठी मल्हारराव होळकर महाराज हवे होते..असे जाणवू लागले…आपणच,प्रत्येकाने पुण्यश्लोक अहिल्यामाता व्हावे अन् माणुसकीचा बदल घडवून आणून माणूस असल्याची पावती द्यावी.
कुमारी महिला बऱ्याच वेळा तिच्या नावाआधी श्रीमती हा शब्द लावते…विवाहित महिला ही किती तरी दिवस सासरचे नाव लावत नाही तो पर्यंत श्रीमती किंवा कुमारी हा शब्द लावतात…मग पती निधन झाल्यानंतर लगेच त्या महिलेचे सौ…हे अक्षर काढून श्रीमती हे लेबल दिले जाते…मग,श्रीमती या शब्दाचा अर्थ नक्की काय समजावा.पुरुषांचे सुरुवातीला म्हणजे १८ वर्षा पर्यंत चिरंजीव अन् नंतर श्री …मग नंतर परत तिसरा नामांतरण विधी त्याचा का होत नाही.पेमेंट सिल्पा यावर ही फक्त कुमारी/ श्री/ श्रीमती असाच शब्द असतो…हे साधे ही समजत नाही…ती काही पदवी नाही .शिकून पदवी मिळवा अन् ती लावा आपल्या नावासमोर…नको त्या पदव्या कोणी कोणाला द्यायची गरज नाही? कुमारिकेचे एकदा लग्न झाले की ती सौभाग्यवती किंवा श्रीमती झाली..बस.ती त्यावेळी ही मुलांची आई असते,नवऱ्याची पत्नी असते,सासू सासऱ्यांची सून असते,आई बापाची लेक,भाऊ बहिणीची बहीण,दिराची,नांनदेची भावजय च असते..ते नाते बदलते का? मग,तिचा पती गेल्यावर नको ते बंधने का?तिला ही माणूस म्हणून जगू द्या..अन् तुम्ही ही माणूस आहात याची पावती आपल्या वागणुकीतून द्या.कुंकू लावल्याने फार मोठा तीर मारला असे होत नाही?किंवा पती जिवंत होत नाही?किंवा तसे केल्याने तुम्ही लहान होत नाही? किंवा तुम्हाला कसला धोका होतो असेही नाही?कुंकू लावणे हे शास्त्रीय दृष्ट्या योग्य आहे. विषमता पसरवणे थांबले पाहिजे इतकाच हा लेख लिहिण्यामागचा हेतू.