शबनम न्युज | नवी दिल्ली
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली आहे. या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भाषण केले. राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या भाषणात विविध मुद्यांचा आढावा घेतला. त्या म्हणाल्या, “२०४७ पर्यंत आपल्याला भूतकाळातील वैभवाशी जोडलेले आणि आधुनिकतेचे सर्व सोनेरी अध्याय असलेले राष्ट्र निर्माण करायचे आहे. आपल्याला असा भारत घडवायचा आहे जो ‘आत्मनिर्भर’ असेल आणि आपली मानवी कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असेल,” असे मुर्मू म्हणाल्या.
तसेच पुढे ते म्हणाल्या, “आयुष्मान भारत योजनेने देशातील करोडो गरीब लोकांना गरीब होण्यापासून वाचवले आहे, ८० हजार कोटी रुपये खर्च होण्यापासून वाचवले आहेत. सर्जिकल स्ट्राईकपासून दहशतवादावर कठोर कारवाईपर्यंत, नियंत्रण रेषेपासून एलएसीपर्यंत, कलम ३७० रद्द करण्यापासून ते तिहेरी तलाकपर्यंत प्रत्येक गैरप्रकाराला चोख प्रत्युत्तर देण्याची माझ्या सरकारची ओळख आहे,” असे मुर्मू म्हणाल्या.