शबनम न्युज | मुंबई
“धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो, असं म्हणत आता लढाई सुरु झालीय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आज माझ्याकडे काहीच नाही, परंतु मी खचलेलो नाही, खचणारही नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी ते भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा मातोश्रीबाहेर येऊन शिवसैनिकांना संबोधित केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “कपट कारस्थानाचं राजकारण सुरू आहे. शिवसेना संपवण्याचं काम सुरु आहे. मात्र शिवसेना संपवता येणार नाही. धनुष्यबाण पेलायला मर्द लागतो, असं म्हणत आता लढाई सुरु झालीय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच आज माझ्याकडे काहीच नाही, परंतु मी खचलेलो नाही, खचणारही नाही, असं म्हणताना उद्धव ठाकरे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. आजपासूनच निवडणुकांच्या तयारीला लागा, चोरांचा आणि चोर बाजारांचा आपण नायनाट करू,” असा आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिला.