शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव आळंदी पुणे बुधवार दिनांक ८ मार्च २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महिला तक्रार निवारण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन विद्यालयात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली अभंग यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला तक्रार निवारण विभागाच्या प्रमुख प्रा. शैला वाळुंज यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात होते. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रमुख वक्त्या म्हणून लाभलेल्या बाबुराव घोलप कॉलेज सांगवी पुणे इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.संगीता तानाजी घोडके यांनी जागतिक महिलांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करून उदाहरणे सांगत विद्यार्थिनींना बहुमोल असे मार्गदर्शन केले.त्यांनी आपल्या व्याख्यानातून सुरुवातीपासून महिला ह्या सक्षम होत्या परिस्थितीला विरोध करणाऱ्या बंड करणाऱ्या होत्या हे पटवून देत असताना त्यांनी रामायणातील सीता, महाभारतातील द्रौपदी आणि कुंती यांनी कशाप्रकारे पुरुष संस्कृतीला विरोध केला याची उदाहरणे दिली. भारतीय स्त्री जीवन आणि पाश्चात्त्य स्त्री जीवन यांच्यातील फरक सांगितला. भारतीय संस्कृतीत महिलेला दुय्यम स्थान आहे. आणि ती एक उपभोगाची वस्तू आहे हे त्यांनी काही दाखले देत महिलांविषयी होणारी अधोगती सांगितली. स्त्रियांनी आपल्या आरोग्य विषयी जागृत असले पाहिजे जातीभेद, वर्णभेद याप्रमाणे लिंगभेद देखील ही संस्कृती आपल्याला शिकवते त्यात स्त्रीला दुय्यम स्थान दिले गेले आहे यामध्ये बदल झाला पाहिजे. कारण बदल ही काळाची गरज आहे. जगाची निर्मिती जर स्त्री पासून होते तर ती दुय्यम कशी असू शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.चायना मध्ये वयोवृद्ध स्त्रीला खूप महत्त्वाचा दर्जा दिला जातो.मातृसत्ताक पद्धती म्हणून मोहंजोदडो आणि हडप्पा या संस्कृतीकडे पाहिले जाते. म्हणजेच स्त्री म्हणेल त्याच पद्धतीने कामकाज होत असे. आसाम मधील कामख्या देवीचे मंदिर आहे. त्या ठिकाणी स्त्री लिंगाची पूजा केली जाते जगाची उत्पत्ती स्त्री पासून होते तर ती दुय्यम कशी असू शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. लाइफ पार्टनर म्हणून म्हणत असताना स्त्री आणि पुरुष असा भेद कशासाठी करायचा हे योग्य नाही,असे उदाहरण देत पटवून दिले शेवटी त्यांनी आपल्या भाषणाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थिनींना आपले स्वत्व ,स्वाभिमान आणि कर्तव्य याची जाणीव करून दिली.
यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या स्त्री आणि पुरुष असा भेद न करता समानतेने जीवन व्यवहार केला पाहिजे असे मत व्यक्त केले तसेच स्त्रियांना ५० टक्के आरक्षण मिळाले पाहिजे असे मत मांडले. या कार्यक्रमाला माननीय श्री मयूर ढमाले सर खजिनदार श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे आभार इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. छाया जोशी यांनी मांडले. या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. संजीव कांबळे प्रा. कैलास अस्तरकर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी आणि प्रा. शैला वाळुंज महिला तक्रार निवारण विभाग यांनी केले तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपप्राचार्य. डॉ. पांडुरंग मिसाळ, प्रा. प्रेरणा पाटील प्रा. सविता मानके प्रा सोनाली अभंग डॉ छाया जोशी प्रा. सोनाली तापकीर प्रा.यशोदा खुळखुळे प्रा. दिपाली ताम्हणे प्रा. दिपाली सोनवणे प्रा. राजश्री खडके तसेच कार्यालयीन कर्मचारी वर्षा ताजने ,नेहा लांडगे आणि महाविद्यालयाचे अधिक्षक प्रवीण भावे यांचे अनमोल असे सहकार्य लाभले. तसेच या कार्यक्रमासाठी रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग होता. या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख, प्रा. प्रविण डोळस यांनी दिली.