शबनम न्यूज | सातारा
धार्मिक तेढ निर्माण करून परस्परांना भिडविण्याचे पाप भाजपने केले आहे. काहीही करून सत्ता मिळवणे आणि ती मिळत नसेल तर सत्ता संघर्ष वाढवणे ही भाजपची धोकादायक निती झाली आहे. सहिष्णुता आणि धर्मनिरपेक्षता हा आपल्या देशाचा आत्मा आहे. ऑपरेशन लोटस च्या नावाखाली देशाचा हा आत्माच नष्ट करण्याची भूमिका भाजपाने घेतली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. सातारा येथे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 64 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश मध्ये लोक फोडून भाजपाने सरकार आणले. सत्ता मिळाली नाही आणि लोकांनी नाकारले तर सत्ता आणि संपत्तीचा वापर करून लोक फोडायची, त्याच सोबत संसदीय लोकशाही उध्वस्त करायची, हे सूत्र भाजपाने स्वीकारले आहे, असं त्यांनी म्हंटले आहे.