शबनम न्युज | पुणे
बैलगाडा शर्यतीला मान्यता हा राज्यातील शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. ते भाजप प्रदेश कार्य समितीच्या बैठकीसाठी पुण्यात आले होते तेव्हा पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, मुख्यमंत्री असताना बैलगाडा शर्यती सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र काहींनी त्याविरोधात याचिका दाखल केली. त्यामुळे यासंदर्भात शास्त्रीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीने बैल हा धावणारा प्राणी आहे असा अहवाल दिला. आमदार महेश लांडगे, राहूल कूल यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हा शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा मोठा विजय आहे. आम्ही जी मेहनत केली आज ती खऱ्या अर्थाने यशस्वी झाली आहे. आमचा कायदा आणि आम्ही केलेला रिपोर्ट या दोन्ही गोष्टी सुप्रीम कोर्टाने योग्य ठरविले आहे, असंही फडणवीस म्हणाले.