शबनम न्यूज | मुंबई
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यात पाणी सोडण्याची चाचणी बुधवारी घेण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की,”मागील अडीच वर्षे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं. हे सरकार कुठलंही निर्णय घेत नव्हतं. कुठलाही निर्णय न घेणं हाच एक निर्णय त्यांनी घेतला होता. या सरकारला निर्णय लकवा झाला होता. त्यामुळेच कुठलेच निर्णय होत नव्हते.” अशी टीका फडणवीस यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
राऊत म्हणाले, “महाराष्ट्रात सध्या सरकार आहे का? आमच्या सरकारला निर्णय लकवा झाला होता, शिंदे फडणवीस सरकार स्मशानात पोहचलंय. डोळे बंद आहेत, कान बंद आहेत सगळं बंद आहेत. त्यांनी लकव्याच्या गोष्टी करु नयेत.” असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.
पंकजा मुंडे यांच्यावर पक्षावर अन्याय होतो आहे. त्यामुळे त्यांनी मनातली खंत बोलून दाखवली. त्यांचा पराभव कसा झाला हे सगळ्यांना माहित आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.