शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी :
गेल्या अनेक दिवसांपासून सगळीकडे शासनाच्या योजनेच्या अंमलबजावणीचे अनेक उपक्रम राबविले जात आहेत राज्य भरातील अनेक गरजू लोकांना लाभ देखील होत आहे परंतू महाराष्ट्र राज्यातील कंजारभाट समाजाचे अनेक लोक योजना अभावी वंचित आहे, असा थेट सवाल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कंजारभाट समाज कृती समितीच्या वतीने मागणी चे निवेदन देण्यात आले
या वंचित समाजाला या शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा या करीता म्हणून कंजारभाट समाज कृती समितीच्या वतीने पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमात कृती समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. राजेश नवले, कार्यध्यक्ष श्री. मनोज माछरे, जनरल सेक्रेटरी श्री. दर्शन मलके, कोर कमिटी सदस्य श्री. मोहन बन्सी नवले, सेक्रेटरी श्री. अभय भाट सातारा जिल्हाध्यक्ष श्री. नरेश नवले, पुणे ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष श्री. गणेश माछरे यांच्या उपस्थित कृती समितीचे मुख्य प्रवक्ता श्री. अक्षय मनोज माछरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांना १९६१ चा पुरावा रद्द करण्याची मागणी तसेच या वंचित समाजाला या शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आणि सन्मानिय मुख्यमंत्री साहेबांनी त्वरित नमूद मागणीवर विभागीय आयुक्तांकडे दखल घेण्याचे निर्देश दिले.
तसेच सदर प्रश्न घेऊन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काल दिनांक १५ जून २०२३ रोजी मावळ मतदार संघाचे विद्यमान खासदार माननीय. श्रीरंग बारणे साहेबांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले आहे.