शबनम न्युज | पिंपरी
कंजारभाट समाज विकास कृती समितीच्या कार्याला यश मिळत असून, लवकरच शासन आपल्य दारी योजनेतुन जातीच्या दाख़ले संदर्भातील जाचक अटी-शर्ती पासून आपला समाज मुक्त होणार आहे. यासाठी कंजारभाट समाज विकास कृती समिती वारंवार पाठपुरावा करत आहेत. दरम्यान कंजारभाट समाज विकास कृती समितीचे नेते व शिवसेना युवा सेना नेते सिद्धूभाऊ अभंगे आणि शिवसेना युवा सेना सचिव पूर्वेश सरनाईक यांच्या विशेष प्रयत्नाने, समवेत मुख्य प्रवक्ते अक्षय मनोज माछरे आणि अंबरनाथ मुंबई चे जिल्हाध्यक्ष विनोद तामचेकर खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली.
यावेळी त्वरित विभागीय समितीचे मुख्य अधिकारीअमोल शिंदे साहेबांना कार्यालयात बोलावून (जातीचा दाखला साठी) १९६१ जाचक अट रद्द कशी होईल या साठी सखोल चर्चा करण्यात आली. तसेच या चर्चेतून सबंधित अधिकारी वर्गाने सगळ्या गोष्टीची विचार करून लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यासाठी कार्यालयीन बैठीकीचा प्रस्ताव कृती समितीला देण्यात आला. तत्पूर्वी राज्यभरात जर कुठल्याही समाजबांधवाना कंजारभाट जातीचा दाखल्याच्या कामासाठी किंवा इतर शासकीय अडचण भासल्यास संपर्क करण्यास परवानगी देखील दिली आहे आणि आम्ही सबंधित अधिकारी वर्गाशी बोलून तुम्हाला ताबडतोब दाखले प्रदान करू असे आश्वासन यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे.