शबनम न्यूज | मुंबई
महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याच्या मार्गावर होते, तेव्हा राष्ट्रवादीच्या 54 पैकी 51आमदारांनी शरद पवारांना पत्र लिहीत भाजपा बरोबर जाण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. पण शरद पवार वेळेवर निर्णय घेण्यात अयशस्वी ठरले, असा गोप्यस्फोट खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
ते म्हणाले, “2022 च्या मध्यातच भाजपा बरोबर जाण्यासाठी हालचाली सुरू होत्या, मात्र शरद पवार तातडीने निर्णय घेण्यास अपयशी ठरले. यामुळे एकनाथ शिंदे यांनी संधी साधली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर सरकार स्थापन केलं.
यावेळी बोलताना प्रफुल पटेल म्हणाले, “शिवसेनेबरोबर आमचे वैचारिक मतभेद होते. तरीही आम्ही सेनेबरोबर सरकार स्थापन केले. त्यामुळे राष्ट्रगीत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही भाजपा बरोबर हात मिळवणी केली आणि सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.