शबनम न्यूज | मुंबई
भाजपाने शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, आता ते महाराष्ट्र फोडतील. त्यांना विरोध करणारा कोणी नको आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली आहे. ते मातोश्रीवर शिवसैनिकांशी संवाद साधत होते
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी आणि आमदारांनी राज्यातील सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने महाराष्ट्रात वर्षभरातील दुसरा भूकंप झाला आहे. दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात या भूकंपाची चर्चा होत आहे.
पुढे ते म्हणाले, ही लढाई एवढी घाणरडे आणि विकृत आहे. महाराष्ट्राबद्दल त्यांच्या मनात असला द्वेष आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेना आपल्या सोबत नको होती, म्हणून त्यांनी शिवसेना फोडली. आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. आता ते महाराष्ट्रही फोडतील. तेव्हा विरोध करायला त्यांना कोणी नको आहे, मात्र ते आम्ही होऊ देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.