शबनम न्युज | मुंबई
“आम्ही त्या दोन जणांमुळे बाहेर पडलो, असे अजित पवार गट सांगत आहे. तर मी शपथ घेतो की, मी तर बाहेर जाईलच पण जयंत पाटील यांनाही घेऊन जाईल, मात्र तुम्ही परत या,” असे भावनिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले आहे.
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून पक्षाच्या आठ आमदारांसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अजित पवार यांना आव्हाड यांनी भावनिक आवाहन केले आहे.
ते म्हणाले, आम्ही तर दोन-चार जणांमुळे बाहेर पडलो, असे अजित पवार गट सांगत आहे. मला सत्तेचे राजकारण करायचे नाही. पैशाचे राजकारण करायचे नाही, तर तुम्हाला वाटत असेल, माझ्यासारखा माणूस पक्षातून बाहेर गेल्याने पक्ष खूप वाढणार आहे, तर मी शपथ घेतो की, मी तर बाहेर जाईलच पण जयंत पाटील यांनाही घेऊन जाईल.”
पुढे ते म्हणाले, अजित पवार गट जयंत पाटील आणि आमच्यावर टीका करत आहे. की बडव्यांनी शरद पवार साहेबांना घेरले आहे. तर या बडव्यांना नाही राहायचं, आम्हाला काहीही नको, आम्ही सगळे सोडून जातो, तुम्ही फक्त परत या. पण साहेबांना त्रास देऊ नका, असे भावनिक आवाहन आव्हाड यांनी पवार यांना केले आहे.