शबनम न्युज | मुंबई
सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच लवकरच या संदर्भात निर्णय घेण्याचे ही न्यायालयाने सुचविले होते. त्यात शिंदे सरकार बेकायदेशीर असून जर वेळेत निर्णय घेतला नाही, तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे अनिल परब यांनी माध्यमांना सांगितले.
तसेच शिवसेनेतील वाद आणि सत्ता संघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असल्याचे सांगत 16 आमदारांना अपात्र करण्याचा निर्णय घेण्याचे त्यांना सूचित केले आहे. त्यावर आता कार्यवाहीला सुरुवात झाल्याचे दिसून येते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह त्यांच्या गटातील एकूण 16 आमदारांना नोटीस पाठवली असून, पुढील 7 दिवसात निर्णय देण्याचे बजावले आहे.
राज्याच्या राजकारणात मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा सुरू असताना आमदारांना नोटीस बजावल्यामुळे अनेकांची धाकधूक वाढली आहे. त्यात 17 जुलैपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून, या संदर्भात घोषणाही करण्यात आली आहे. दरम्यान अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे खातेवाटप झालेले नाही. अजित पवार हे अर्थ खात्यासाठी आग्रही असल्याचे समजते, पण शिंदे गटाकडून अर्थ खाते राष्ट्रवादीस देण्यास विरोध होत असल्याचेही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.