शबनम न्युज | मुंबई
“हाच स्वभाव नडला आणि कारण नसताना आमचा बाप काढला. आता भोगा आपल्या कर्माची फळं, असं म्हणत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. आपल्या ट्विटर अकाउंट वरून याबाबत शेलार यांनी ट्विट केलं आहे.
“मुख्यमंत्री राजीनामा देणार!, सरकार पडणार!!, उबाठा मध्ये काही आमदार परत येणार!!!अजित दादांसोबतच्यांची आमदारकी धोक्यात!!! मीडियात अशा अफवा लाखात…पसरवणारे एकच ते महान “विश्वविख्यात”. हाच स्वभाव नडला आणि कारण नसताना आमचा बाप काढला. आता भोगा आपल्या कर्माची फळं!” असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण दिले आहे. याच दरम्यान भाजपाने उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.