शबनम न्युज | मुंबई
“कालपासून मणिपूर मधील समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत, ती हादरवणारी आहेत, आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान महोदयांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी ह्या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल हे पहा, पण परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आणि हेच दुर्दैव आहे.” अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मणिपूर मध्ये घडलेल्या घटनेच्या संदर्भात ट्विट करत दिली आहे. यामध्ये त्यांनी संताप व्यक्त करत दोन्ही सरकारांवर टीका केली आहे.
मणिपूरमध्ये संतापजनक घटना घडली असून त्या घटनेचा सोशल मीडियावर बुधवारी एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. मणिपूरमध्ये ८०० ते १००० लोकांच्या जमावाने दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढली. एवढंच नव्हे तर आरोपींनी पीडित महिलांना बाजुच्या शेतात घेऊन जात त्यांच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा देखील आरोप आहे. त्याचदिवशी जमावाने २१ वर्षीय पीडित महिलेच्या १९ वर्षीय भावाची हत्या केली होती. एक कथित बनावट व्हिडीओ समोर आल्यानंतर संतप्त जमावाने हे घृणास्पद केलं आहे.
ते म्हणाले, “कालपासून मणिपूर मधील समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत, आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान महोदयांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी ह्या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल हे पहा, पण परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आणि हेच दुर्दैव आहे.
ह्या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. पण त्याचवेळेस जर केंद्रसरकारकडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपती महोदयांनी ह्यात लक्ष घालायला हवं. मणिपूरमध्ये गेल्या ३ महिन्यात जे घडलं त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण भारताच्या समाजमनावर ओरखडा उमटला आहे आणि ह्यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल. पंतप्रधानांनी आत्ता जरी ह्या घटनेचा निषेध केला असला तरी तो पुरेसा नाही, आता कृती करा, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल.”
कालपासून मणिपूर मधली समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत, आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान महोदयांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी ह्या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित…
Advertisement— Raj Thackeray (@RajThackeray) July 20, 2023