शबनम न्युज | मुंबई
आज सकाळी समृद्धी महामार्गावर मोठा अपघात घडला आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. बुलढाण्यात झालेल्या अपघाताला एक महिना उलटत नाही तोवर समृद्धीवर दुसरा अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल १६ जणांचे प्राण गेले आहेत. समृद्धी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्यातील काम युद्धपातळीवर सुरू आहे. रात्रकालीन काम सुरू असताना शहापूर सरंळाबे येथे क्रेन आणि स्लॅब कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे,
ठाकरे म्हणाले, शहापूर येथे समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना क्रेन कोसळून १६ कामगारांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. ही घटना दुर्दैवी असून अशा घटना टाळण्यासाठी काटेकोर खबरदारी घेतली पाहिजे.
मृतात्म्यांस भावपूर्ण श्रध्दांजली आणि जखमींना लवकरात लवकर बरं करण्यासाठी प्रार्थना! असे ट्विट त्यांनी केले आहे.
शहापूर येथे समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्यातील काम सुरु असताना क्रेन कोसळून १६ कामगारांचा झालेला मृत्यू अत्यंत क्लेशदायक आहे. ही घटना दुर्दैवी असून अशा घटना टाळण्यासाठी काटेकोर खबरदारी घेतली पाहिजे.
मृतात्म्यांस भावपूर्ण श्रध्दांजली आणि जखमींना लवकरात लवकर बरं करण्यासाठी…
Advertisement— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) August 1, 2023