पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो मार्गाचे लोकार्पण !
शबनम न्युज | पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील विस्तारित मेट्रो मार्गांचे लोकार्पण करण्यात आले आहे. तसेच यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड भागाला 15 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची लोकार्पण तसेच भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, या प्रकल्पाच्या लोकार्पणासाठी पुणेवासियांचे अभिनंदन करतो. तसेच ऑगस्ट हा उत्सव आणि क्रांतीचा महिना आहे या महिन्याच्या सुरुवातीला पुण्यात येण्याचे भाग्य लाभले. सार्वजनिक वाहतुकीला अध्यायवत करण्याची गरज आहे. यासाठी मेट्रो, मोठे उड्डाणपूल, हायवे यांची निर्मिती होत आहे. देशात 800 किमी पेक्षा जास्त चे मेट्रो काम सुरू आहे. 2014 पर्यंत पाच शहरात मेट्रो जाळे, आता 20 शहरात मेट्रोचे जाळे विस्तारात आहे. महाराष्ट्रात, मुंबई ,पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे आणखी विस्तारत आहे. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
तसेच स्वच्छ भारत अभियान केवळ शौचालयापुरते मर्यादित नाही तर घनकचरा व्यवस्थापन तितकेच महत्त्वाचे आहे. शहरात वेस्ट टू वेल्थ या संकल्पनेवर काम सुरू आहे, पिंपरी चिंचवड येथे वेस्ट टु एनर्जी प्रकल्प सुरू होत आहे. या स्वच्छ भारत अभियानात तसेच देशाच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्राचे योगदान अत्यंत मोलाचे आणि महत्त्वाचे आहे. पुढे ते म्हणाले, महाराष्ट्र आणखी गतीने विकास करण्यासाठी तीन वेगवेगळे पक्ष एकत्र सत्तेत आले आहे. देशातील जनतेच्या वर्तमानासह भविष्य ही चांगले करण्यावर आमचा भर आहे. सत्ता येते आणि जाते वेळ आणि देश तिथेच असतो. राज्याच्या विकासातून देशाचा विकास हाच आमचा मंत्र असल्याचे यावेळी मोदी म्हणाले.
आपल्याला भारतातील शहरात राहणाऱ्या लोकांचं जीवनस्तर चांगलं बनावायचं आहे, आपल्याला त्याला मोठ्या उंचीवर न्यायचं असेल तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आधुनिक बनवावं लागेल. भारतातील अनेक शहरांत मेट्रोचा विस्तार होत आहे. नवनवे फ्लायओव्हर बनवले जात आहेत. रेड लाईट्सची संख्या कमी केली जात आहे. २०१४ पर्यंत भारतात २५० किमीपेक्षाही कमी मेट्रो नेटवर्क होतं. यापेक्षा अधिक दिल्ली एनसीआरमध्ये होतं. आता मेट्रो नेटवर्क वाढून ८०० किमी पेक्षाही जास्त झालं आहे. याशिवाय १ किमी नव्या मेट्रो लाईनसाठी काम सुरू आहे. पाच शहरात मेट्रोचे निर्माण आज देशातील वीस शहरांत संचालित आहे. महाराष्ट्रातही पुणेशिवाय, मुंबई आणि नागपूरमध्ये मेट्रोचं विस्तार होत आहे. मेट्रो नेटवर्क आधुनिक भारताच्या शहरांची नवी लाईफलाईन बनत जात आहे. महाराष्ट्राचा विकास झाला तर भारताचा विकास होईल. भारताचा विकास झाला तर महाराष्ट्राचा विकास होईल, - नरेंद्र मोदी, पंतप्रधान