शबनम न्युज | मुंबई
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांची खासदारकी पुन्हा बहाल करणारा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे काँग्रेसच्या गटात आनंदाचे वातावरण आहे. राहुल गांधी आता पुन्हा संसदेत परतणार आहे आहेत. त्यामुळे राहुल गांधी आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सहभागी होऊ शकतात असे मानले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे काँग्रेसकडून स्वागत केले जात आहे. काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागत आहे असल्याचे म्हटले आहे.
तसेच सुप्रिया सुळे यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, सत्यमेव जयते! कोणीही सत्याचा आवाज दाबू शकत नाही. राहुल गांधी यांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. देशात लोकशाही शिल्लक आहे हे दिसून आले चुकीच्या पद्धतीने दिलेल्या शिक्षेला प्रगती मिळाली आहे, राहुल गांधी तुमचे संसदेत स्वागत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
तसेच काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र दिल्यानंतर त्यांना पुन्हा सदस्य तत्व मिळणार आहे. आजचा निर्णय ही समाधानाची बाब आहे. शुल्लक गोष्टीवरून सदस्य रद्द करणे हा निर्णय लोकशाहीला मारक होता. परंतु कुठेतरी सत्याचा विजय होतोच. ते झाले, आता राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल होईल, यात संशय नाही, असे चव्हाण म्हणाले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला प्रगतीचा काँग्रेस पक्ष स्वागत करत असून, हा सत्याचा विजय आहे. देशात हुकूमशाही व मनमानी कारभार सुरू असून, या शक्तींच्या विरोधात काँग्रेस न डमकता उभी आहे. राहुल गांधी यांच्यावर खोट्या तक्रारीच्या माध्यमातून शिक्षा देण्याचे काम झाले होते. पण देशात न्यायव्यवस्था जिवंत आहे. राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती हा सत्याचा विजय व हुकुमशाही वृत्तीला चपराक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.