शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील पवना धरण 93% भरले आहे त्यात 7.8 टीएमसी पाणी आहे नुकतेच धरणातून चौदाशे कुसेक्स ने पाणी सोडण्यात आले मात्र शहराला अजूनही दिवसाड पाणीपुरवठा होत आहे तेही दोनच तास यासाठी जर शहराला पाणीपुरवठा करणारे धरण 93% भरले आहेत तर शहराचा पाणीपुरवठा रोज 24 तास करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी पदवीधर संघाचे माधव पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 93 टक्के भरले आहे मात्र शहराला अजूनही दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे ते सुद्धा दोनच तास अपुरा पाण्यामुळे महिला वर्गाला खूप त्रास सहन करावा लागत आहे गेल्या पाच वर्षात धरणात पुरेसे पाणी होते पण व्यवस्थित व्यवस्थापन नसल्याने नागरिकांचे हाल होत होते तुम्ही शब्द दिला होतात की सत्य तालुक्यात 24 तास पाणी देणार आता आपण उपमुख्यमंत्री आहात आणि धरणातही पुरेसे पाणी आहे त्यानुसार पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा रोज 24 तास करावा जेणेकरून नागरिकांची हाल होणार नाहीत असेही दिलेले निवेदनात नमूद करण्यात आले आहे.