शबनम न्यूज | जालना
मराठा आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात आहे. आमरण उपोषण मागे घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार समोर पाच अटी ठेवल्या आहेत.
मराठा आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात आहे,. मी सरकारला इथे बोलावतो. आपल्यावर डाग लागू द्यायचा नाही. सरकारी इथे आले तरी, जसे आले तसे परत गेले पाहिजे. आपल्यावर कुठलाही डाग लागू द्यायचा नाही. मराठी बोलवतात आणि त्यानंतर फसवते असा दगा फटका करायचा नाही , दूरदृष्टी ठेवल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांच्या राज्य सरकारला 5 अटी –
1. अहवाल कसाही येऊ द्या. मराठ्यांना 31 व्या दिवशी राज्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची हे मला आज लेखी द्यायचे.
2. महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल आहेत ते सर्व मागे घेतले पाहिजे.
3. जे अधिकारी दोषी आहेत त्यांना निलंबित करावे.
4.उपोषण सोडायला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सगळे मंत्रिमंडळ, छत्रपती संभाजी राजे, छत्रपती उदयनराजे उपस्थित हवेत. सरकार आणि मराठा समाजाच्या मध्ये दोन्ही राजे उपस्थित राहावेत.
5. मुख्यमंत्री किंवा सरकारने हे सर्व आम्हाला लेखी लिहून द्यावे, सरकारने टाईम बॉण्ड सांगावे.