शबनम न्युज | मुंबई
अभिनेते समीर सोनी आज 29 सप्टेंबर रोजी 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. 1998 मध्ये आलेल्या चायना गेट या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या समीर सोनीचा जन्म लंडनमध्ये झाला होता. समुंदर या टीव्ही मालिकेतून अभिनयाच्या जगात त्यांनी एन्ट्री केली होती. बॉलिवूडमध्ये सर्वात्कृष्ट अभिनेत्यांपैकी समीर सोनी एक आहेत.
चित्रपटात येण्यापूर्वी समीर सोनीने सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून देखील काम केलेले आहे. मात्र अभिनयाची आवड असल्याने बँकेची नोकरी सोडून ते मुंबईला परतले. समीर सोनीच्या चित्रपटांविषयी अनेकांना माहिती असेल, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्य बद्दल फार कमी जणांना माहिती आहे. समीर सोनी चे लग्न 1996 मध्ये राजलक्ष्मी खानवरकर सोबत झाले होते. पण हे लग्न फारकाळ टिकले नाही. लग्नाचे अवघ्या सहा महिन्यात दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. 1997 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला आणि दोघेही आपल्या आयुष्यात पुढे निघून गेले. त्यानंतर समीरच्या आयुष्यात अभिनेत्री नफीसा जोसेफची एन्ट्री झाली. मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. दोघांनी साखरपुडा देखील केला, पण यावेळी अभिनेत्याला लग्नाबाबत कोणतीच घाई करायची नव्हती, पण हे नातं लग्न पर्यंत पोहोचू देखील शकले नाही, दोन वर्षात त्यांचा साखरपुडा देखील मोडला.
त्यानंतर 2008 मध्ये समीरच्या आयुष्यात अभिनेत्री नीलम कोठारी आली. या जोडप्याला एकत्र आणण्यात टीव्ही क्वीन चा मोठा वाटा होता. काही वर्ष डेटिंग केल्यानंतर 2011 मध्ये दोघांनी लग्न केले. या जोडप्याने एका मुलीला दत्तक घेतले आणि ते सुखी कौटुंबिक जीवन जगत आहेत.