शबनम न्युज | पिंपरी
महात्मा गांधी यांनी स्वच्छ भारताचे स्वप्न पाहिले होते. देशातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन परिसर स्वच्छ, कचरा मुक्त ठेवावा, पर्यावरणाचे रक्षण करावे, शौचालये निर्माण करावी अशी संकल्पना होती. त्यासाठी महात्मा गांधींनी लोकांना माहिती देऊन प्रशिक्षीत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीजींचे हे विचार, स्वप्न साकार करण्यासाठी ‘स्वच्छ भारत’ अभियान सुरू केले असून ही एक चळवळ झाली आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे (पीसीयु) कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले.
पिंपरी चिंचवड विद्यापीठ, साते मावळ, पुणे येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छ भारत’ अभियान राबविण्यात आले. या अभियानात पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, प्रभारी कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, प्र-कुलगुरू डॉ. राजीव भारद्वाज, कुलसचिव डॉ. डी. एन. सिंग, प्राध्यापक, कर्मचारी सहभागी झाले होते. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. त्यामुळे परिसर स्वच्छ, सुंदर व रोगराई पासून मुक्त राहतो, हा संदेश या अभियानाव्दारे देण्यात आला.