शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी : पुनावळेत मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण संस्था असून शाळा, महाविद्यालये झाली आहेत. लोकांचा प्रस्तावित कचरा डेपो ला प्रचंड विरोध आहे. वाढलेली लोकवस्ती विचारात घेता पुनावळेत कचरा डेपो केला जाणार नसल्याची ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी पुनावळेतील कचराडेपो बाबत लक्षवेधी मांडली होती. २००८ मध्ये २६ हेक्टर जागा कचरा डेपो साठी आरक्षित केली होती . परंतु, १५ वर्षे आरक्षण विकसित झाले नाही. या कालावधीत गृहप्रकल्प, शैक्षणिक संस्था या भागात झाल्या एका लाखाहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. वन विभागाच्या जागेत कचरा भूमी झाल्यास वृक्षतोड होईल. पुनावळे जवळील रावेत बंधारा यातून पवना नदीतील पाणी शहरवासीयांसाठी उचलले जाते. पावसाळ्यात कचरा भूमीतील दूषित पाणी सखल भागात पवनेच्या पात्रात येऊन पिण्याचे पाणी दूषित होईल. नागरिकांच्या आरोग्यास परिणाम होईल. त्यामुळे कचरा भूमी रद्द करावी. अटी पूर्तता अहवाल विहित मुदतीत सादर केला नसल्याने प्रकल्प रद्द होतो.
पुनावळेगाव १९९८ मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आले.या भागात लोकवस्ती वाढली असून शाळा, महाविद्यालये आहेत. लोकांचा कचरा भूमीला विरोध आहे. त्यामुळे पुनावळेत कचरा भूमी होणे अशक्य आहे. त्यासाठी पर्यायी जागा शोधली जाईल.असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले
पुनावळे येथील प्रस्तावित कचरा डेपो रद्द व्हावा याकरिता पुनावळे करांच्या वतीने भाजपचे युवा नेते नवनाथ ढवळे यांनी याबाबत चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी प्रस्तावित कचरा डेपो बाबत विधान परिषदेत मुद्दा मांडावा अशी मागणी केली होती त्यास अनुसरून चिंचवडचे आमदार अश्विन जगताप यांनी याबाबत लक्षवेधी मांडली, पुनावळेकरांच्या या मागणीला यश आले आहे