शबनम न्युज | पुणे
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव, (आळंदी) पुणे येथे ‘ग्रंथालय विभाग व सांस्कृतिक विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रंथ महोत्सवा’ निमित्त, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. राजेंद्र कुंभार, (ग्रंथालय आणि माहिती शास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ, पुणे) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर मान्यवरांमध्ये, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे, प्राचार्य डॉ. हंसराज थोरात हे होते , तसेच डॉ. राजेंद्र कुंभार, प्रमुख व्याख्याते, डॉ. राजेंद्र चिकटे, (ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग,सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठ), प्रा. शैला वाळुंज (ग्रंथालय विभाग प्रमुख), डॉ. पांडुरंग मिसळ, (सांस्कृतिक विभाग प्रमुख), हे उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी करून दिला. या कार्यक्रमाची प्रास्ताविक करताना प्रा. शैला वाळुंज यांनी ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यामागील भूमिका, हेतू, उद्दिष्ट्ये व त्याचे महत्त्व सांगून हा ‘ग्रंथ महोत्सव’ दिनांक १६/१२/२०२३ ते २४/१२/२०२३ पर्यंत महाविद्यालयात चालणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात,स्वागतगीत, दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन व ग्रंथ पूजनाने झाली.
डॉ. राजेंद्र कुंभार यांनी, ‘वाचन संस्कृती काळाची गरज’ या विषयावर व्याख्यान देताना वाचनामधून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, कसा घडवून आणावा? त्यासाठी आपण काय केले पाहिजे? त्यासाठी त्यांना कोणत्या चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत? त्यातून त्यांचे मन व जीवन विचार कसे सक्षम बनतील. मोबाईल संस्कृतीचे कोणकोणते दुष्परिणाम विद्यार्थ्यावर होतात? त्याच्यावर कशी मात केली पाहिजे? जगात जी जी मोठी माणसे ज्ञानी झाली, ती सर्व ग्रंथ वाचनामुळेच झाली. ग्रंथ वाचनामुळे विद्यार्थी ज्ञानसंपन्न व त्यांचे अनुभव समृद्ध होतात. व्यक्तिमत्त्वाचे संवर्धन घडते. त्यांना यशाची गुरुकिल्ली अवगत होते. यासाठी विद्यार्थ्यांनी कोण कोणते ग्रंथ वाचले पाहिजेत. याची अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी केली. यासाठी त्यांनी अनेक यशस्वी वाचकांची उदाहरणे ही दिली. वाचन संस्कृती ही कशी काळाची गरज आहे देखील पटवून दिले. मुलाच्या शंकांचे समाधान केले. डॉ. राजेंद्र चिकटे, यांनी आपल्या व्याख्यानामध्ये, यशस्वी ग्रंथपालाच्या पाच सवयी याबद्दलही अचूक अशी माहिती दिली. संशोधनासाठी संकलन कसे करावे? अलीकडची नवीन पुस्तके कोणकोणती उपलब्ध आहेत? हेही सांगितले. प्राचार्य डॉ. हंसराज थोरात, यांनी आपल्या अध्यक्षीय, भाषणामधून, या ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून महाविद्यालयामध्ये, प्रत्येक आजी- माजी विद्यार्थ्यांनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकांनी आपल्या मातृसंस्थेला किमान कमीत कमी एक व जास्तीत जास्त कितीही पुस्तक भेट द्यावीत. त्यामुळे वाचन संस्कृतीची वृद्धी होईलअसे सांगितले.
‘पुस्तक मैत्री, ग्रंथालयाच्या संस्थापिका, सौ. माधुरी हनुमंत भवारी, राजगुरुनगर,यांनी विविध प्रकारचे पुस्तके व ग्रंथ यांचा बुक स्टॉल लावला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमासाठी मयूर ढमाले खजिनदार, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमासाठी खालील प्राध्यापक उपस्थित होते. प्रा शाहूराज युवते, डॉ.छाया जोशी, प्रा संजीव कांबळे, प्रा. सविता मानके , प्रा.दिपाली ताम्हाणे, प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. यशोदा आनेराव, प्रा. रोहित कांबळे, प्रा. प्रीती बुऱ्हाडे व श्री. प्रवीण भावे इत्यादी. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, प्रा. दिलीप बारी यांनी केले. या उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार, प्रा. कैलास अस्तरकर यांनी मानले. सामुदायिक पसायदानाने या कार्यक्रमाचा समारोप झाला, अशी माहिती प्रा. माणिक कसाब, प्रसिद्धी प्रमुख यांनी दिली.