शबनम न्यूज , प्रतिनिधी :
आळंदी : श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव आळंदी व युनिक अकॅडमी, पुणे. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एम.पी.एस.सी व यु.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी?’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन व कु. राजनंदिनीच्या स्वागत गीताने झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी सदर कार्यक्रमाचा उद्देश आणि भूमिका काय आहे या संदर्भात मत व्यक्त केले.
या प्रसंगी पाहुण्यांचा परिचय प्रा कैलास अस्तरकर यांनी करून दिला. प्रमुख मार्गदर्शक मा. श्री.कैलास भालेकर – सीनियर फॅकल्टी मेंबर, युनिक अकॅडमी, पुणे, यांनी विद्यार्थ्यांना प्रथम एम.पी.एस.सी. व यु.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम कसा आहे या संदर्भात मार्गदर्शन करून अभ्यास करतांना जिद्द,चिकाटी व सातत्य महत्वपूर्ण असून ज्या व्यक्तीला सर्वसामान्यांचे प्रश्न सहज कळतात तोच अधिकारी आपल्या कार्यकाळात यशस्वी होतो असे मत व्यक्त केले. जीवनात समस्या महत्त्वाच्या असून जो व्यक्ती समस्यांवर मात करून पुढे जातो तो जीवनात निश्चितच यशस्वी होतो. काहीजण समोर प्रश्न आला की पळ काढतात तर काही प्रश्नाकडे एन्जॉय म्हणून बघतात त्याच व्यक्ती यशाचे शिखर गाठतात. विद्यार्थ्यांनी स्वतःचे ठिकाण निश्चित करून त्याच मार्गाने मार्गक्रमण केल्यास यश हे निश्चितच आपल्या पदरात पडते या संदर्भात एम.पी.एस.सी व यु .पी.एस.सी या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विविध अधिकाऱ्यांचे दाखले देत सखोल मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ठरविलेले स्वप्न साकार करणे सर्वस्वी आपल्या हातात असून त्या स्वप्नाला पूर्ण रूप देण्यासाठी आपले ध्येय निश्चित करण्याची आवश्यकता विशद केली. आधुनिक काळात जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर जगाच्या स्पर्धेत टिकणे कसे महत्वाचे असून त्यासाठी कार्यतत्परता, वेळेचे नियोजन, निर्णय क्षमता व चिकाटी हे मूल्य स्वीकारून भविष्यकालीन वाट चालण्याची गरज व्यक्त केली व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी डॉ. पांडुरंग मिसाळ, डॉ. छाया जोशी, प्रा. संजीव कांबळे,प्रा. दिलीप बारी,प्रा. शाहुराज येवते, प्रा. विकास दिघे, प्रा.शैला वाळुंज,प्रा. दिपाली ताम्हाणे,प्रा. सविता मानके, प्रा.यशोदा आनेराव, डॉ.प्रिती बुऱ्हाडे,डॉ. समीना मोमीन, प्रा.दिपाली सोनवणे, प्रा.सोनाली अभंग,प्रा. माधुरी चौधरी, प्रा.पूजा खवले, श्री.प्रविण भावे,सौ. वर्षा ताजने, कु.नेहा लांडगे, श्री.वैभव बडवे, श्री.श्रीकांत कांबळे अरविंद फलके इत्यादी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप बारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. परमेश्वर भत्ताशे यांनी मानले या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.