शबनम न्युज। मुंबई
आज एक वर्तुळ पूर्ण झालं आहे, ज्या माणसामुळे शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना बाहेर पडावे लागले. आज त्याच माणसाच्या हातातून पक्ष सुटलाय, असा टोला मनसेनेच्या शर्मिला ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला आहे. मुंबई येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेतील आमदार अपात्रतेवर निकाल दिला. यात त्यांनी शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचे सांगितले. यावरून आरोप प्रत्यारोप झाले, तर दुसरीकडे काल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महा पत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालावर आरोप केले. यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत.
दरम्यान, आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, आज एक वर्तुळ पूर्ण झालं आहे, ज्या माणसामुळे शिवसेनेतल्या दिग्गज नेत्यांना बाहेर पडावे लागले, आज त्याच माणसाच्या हातातून पक्ष सुटलाय, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर लगावला आहे.