शबनम न्युज | कोल्हापूर
आज राज्याचे उपमुख्यमंत्री कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे शेतकरी मेळावा घेत आहे. या कार्यक्रमाच्या समारंभाच्या प्रसंगी बोलताना अजित पवार यांनी विनोदी टोलेबाजी केली.
यावेळी बोलताना पवार म्हणाले, “गडहिंग्लजधील नूल वासियांनी हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, मंडलिक आणि माझं चांगलं स्वागत केलं. हे स्वागत मी कधी विसरू शकणार नाही. महिला भगिनी, मुली सर्वजन आमच्यावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत करत होते. काही मुली आम्हाला हळूच पाकळ्या फेकून मारत होत्या. पाकळ्या फेकल्यानंतर त्या हसत होत्या. “कसं याला मारलं..”, असं त्या कदाचित मनात म्हणत असतील.”
पवार पुढे म्हणाले, “हा गमतीचा भाग असल्यामुळे सोडून द्या. शेवटी त्या आपल्या मुली आहेत. आज त्या विद्यार्थीनी आहेत. उद्या कुणाच्या तरी घरी लक्ष्मी म्हणून जाणार आहेत. या मुलींवर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, सोयीसुविधा मिळाव्यात, यासाठी महायुतीचे सरकार प्रयत्नशील आहे.”