शबनम न्यूज प्रतिनिधी,
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक आघाडीचा युवा मिशन 2024 चा महामेळावा आयोजित होत आहे या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात युवकांना मार्गदर्शन केले त्यांचे या भाषणाचे काही मुद्दे खालील प्रमाणे :
अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले ,
युवक म्हटल्यावर एक सळसळत रक्त, त्यांची कष्ट करण्याची तयारी, जिद्दीने कामाला लागायची त्यांची मानसिकता अशा अनेक गोष्टी आपल्याला पहावयास मिळतात.
या बदलत्या जगात आपल्याला देखील पुढे जायचे आहे. नव्या जगाचा नव्या बदलांचा ,स्वीकार हा करावाच लागेल.
राजकारणात अमुलाग्र बदल होत आहे. आपण फार जागरूक राहण्याची गरज आहे. विनाकारण आपल्याला कोणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आपण जागच्या जागी तिथे त्याचं खंडन केलं पाहिजे.
राष्ट्रवादी युवकांची कुठल्याही प्रकारची बदनामी होता कामा नये, पक्षाची बदनामी होता कामा नये,,,
अनेक ठिकाणी पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील ,साखर कारखाने असतील ,सर्व ठिकाणी आम्ही युवकांना संधी देण्याचे काम केलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागत नाही 2022 साली * निवडणुका व्हायला पाहिजे होत्या परंतु आता 2024 आला तरी निवडणुका होत नाहीये याला दोन वर्षापासून निवडणुका झाल्या नाही.
युवकांनाही प्रश्न पडत असेल की सर्वांना पदे मिळतात आमचं काय ? निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना योग्य ती संधी मिळत नव्हती त्यामुळे ओबीसीला राजकीय आरक्षण मिळविण्यासाठी आम्हाला न्यायालयात जावं लागलं, ओबीसी समाज ही महत्त्वाचा घटक आहे त्यांनाही संधी मिळाली पाहिजे
पुढील महिन्यात आचारसंहिता लागेल आगामी लोकसभा निवडणुकीत आपण जो उमेदवार देणार आहोत त्या उमेदवाराला भरघोस मताने विजयी करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युवक कोठेही कमी पडता कामा नये.
आगामी विधानसभा निवडणुकीतही एखाद्या युवकांमध्ये विधानपरिषद लढविण्याची व जिंकण्याची क्षमता असेल नेतृत्व करण्याची चिकाटी असेल त्याने सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जायला हवे वडीलधाऱ्यांचा आदर ठेवला पाहिजे, आपण लोकशाहीमध्ये काम करतो अनेकांचे विचार काय, अनेकांची भूमिका काय आपण समजून घेतली पाहिजे .आणि त्यातून सर्वांना आदर देऊन आपण निर्णय घ्यायला हवा हे युवकांनी लक्षात घ्यायला हवे.
आपण अनेकांना युवक प्रदेशाध्यक्ष पदाची संधी दिली प्रत्येकाने आपली कामगिरी चोख बजावली, तसेच काम पुढील काळात संधी मिळाल्यास युवकांनी केलं पाहिजे, कोणतीही निवड करताना जातीपातीचे राजकारण, नात्यागोत्याचा राजकारण अजिबात करता कामा नये सर्व घटक समाज त्यामध्ये दिसला पाहिजे.
1999 ते 2004 पर्यंत राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आम्ही खूप काम केलं, लोकांमध्ये जाऊन लोकांच्या हिताचे काम केलं त्यामुळे 2004 पर्यंत राष्ट्रवादी पक्ष हा महाराष्ट्र राज्यातील एक नंबरचा पक्ष झाला, मुख्यमंत्री पदाची संधी आली होती परंतु आपण ती संधी स्वीकारली नाही ,का स्वीकारली नाही ? त्याच्या खोलात मी जास्त जात नाही कारण त्याच्या संदर्भात छगन भुजबळ होते आर आर पाटील होते माझी अपेक्षा पण नव्हती पण राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, तो झाला नाही.
आता आपण आपली राष्ट्रवादी संघटना मजबूत करू आता राष्ट्रवादीवर लोकांना विश्वास वाटतोय बरेचसे लोक आपल्याकडे येत आहेत इतर समाजाचे लोक येतात आजही अनेकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढली आहे. शेवटी माणसं जोडली पाहिजे, बेरजेचं राजकारण केलं पाहिजे, पूर्वाश्रमीचे जे आपले सहकारी आहेत त्यांनाही घेऊन आपण पुढे काम करायचं आहे, युवकांमध्ये आव्हाने स्वीकारण्याची तयारी, राजकीय भूमिका स्वीकारण्याची तयारी ,आणि ही भूमिका का स्वीकारली शेवटच्या माणसाला पण आपल्याला न्याय देता आला पाहिजे, त्याचा विकास करता आला पाहिजे म्हणून आपण ही भूमिका स्वीकारली,
युवकांची ताकद आणि शक्ती पक्षाची प्रेरणा आहे.
अजित पवार यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी युवकांना राष्ट्रवादीच्या स्वराज्य सप्ताहाची शपथ दिली सदर सप्ताह 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान संपन्न होत आहे.
या मेळाव्यास छगन भुजबळ, सुनील तटकरे ,धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, रामराजे निंबाळकर, अनिल भाईदास पाटील ,संजय बनसोडे ,अदिती तटकरे ,युवकांचे प्रदेशाध्यक्ष सुरत चव्हाण, अमोल मिटकरी ,पार्थ पवार आदी राष्ट्रवादीचे मंत्री पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.