शबनम न्युज | शिर्डी
“काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही, पण गद्दारी करणाऱ्यांना खोक्यांचा भाव मिळतोय, अश्रुधूर कशासाठी सोडत आहे. माझा शेतकरी असाच रडतोय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली आहे. सोनई, शिर्डी लोकसभा येथील जनसंवाद मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
‘जाऊ तिथे खाऊ’ शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, पण गद्दारी करणाऱ्यांना खोक्यांचा भाव मिळतोय, निवडणुका येतात, तेव्हा ‘सबका साथ आणि झाल्या की मी मित्राचा विकास’ असं म्हणत खोचक टोला लगावलाय.
पुढे ते म्हणाले, तुम्ही म्हणाल ते देशप्रेम-देशसेवा हे आम्ही मानणार नाही. भाजपची पालखी आम्ही वाहणार नाही, निवडणुका येतात तेव्हा सबका साथ आणि निवडणुका झाल्या की मित्राचा विकास, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. तसेच बोलताना ‘जाऊ तिथे खाऊ’ असा टोला लगावत बोचरी टीकाही केली आहे.