शबनम न्युज | मुंबई
आज काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशानंतर बोलताना फडणवीस यांनी अशोक चव्हाण यांची कुठे मदत घ्यायची, हे मला चांगले माहित असल्याचे सांगितले आहे.
पुढे ते म्हणाले, आम्ही कोणते टार्गेट घेऊन चालत नाही. काही नेते आहेत जे आम्हाला वाटते की, आमच्या सोबत येऊ शकतात. अजून काही नेते आमचे चर्चेत आहे. मी असे म्हणणार नाही की 14-15 आमदार येतील, परंतु जमिनीशी जोडले गेलेले जे नेते आमच्या सोबत येतील, त्यांचे आम्ही स्वागत करू, असे फडणवीस म्हणाले.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर टीकाही केली आहे. “एवढ्या वर्षाची पुण्याई सोडून जे लोक आमच्या सोबत का येतायेत? कारण काँग्रेसला घर सांभाळता येत नाही. भाजपाला विरोध करता करतात ते आता देशाच्या विकासाला विरोध करू लागले आहेत. यामुळे त्यांना नेते का सांभाळता येत नाहीत? याचे आत्मचिंतन करावे, अशी टीका देखील फडणवीस यांनी केली आहे.