पीएमपीएल सक्षमीकरणावर जुगल राठी म्हणाले, “सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील बस हा महत्वाचा घटक आहे. बसची संख्या, वारंवारिता, त्यातील सोयीसुविधा यावर गांभीर्याने विचार व्हावा. प्रवाशांच्या प्रमाणात बसची संख्या उपलब्ध करून द्यावी. बसथांबे चांगल्या स्थिती असायला हवेत. केवळ नवीन गाड्या घेण्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा लोकांना फायदा होईल, असे पाहावे. पीएमपीएलमध्ये गेल्या १७ वर्षात २१ अध्यक्षांची बदली झाली. त्यामुळे नियोजनाची घडी बसत नाही. खासगी वाहनांची संख्या रोखायला हवी.”
वाहतूक कोंडीवरील उपायांवर बोलताना प्रांजली देशपांडे म्हणाले, “खाजगी वाहनांमुळे लहान मुलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण पुण्यात अधिक आहे. खाजगी वाहनांवर मर्यादा आणणे गरजेचे आहे. त्यातूनच वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासह त्याचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत सुलभतेने कसा पोहचवता येईल, यावर लक्ष केंद्रित करायला हवे. पुण्यात पीएमटी, मेट्रो, रिक्षा असे अनेक पर्याय आहेत. या गोष्टी सुधारल्या की आपोआप खाजगी वाहने कमी होतील आणि वाहतूककोंडी कमी होईल.”