शबनम न्युज | पुणे
लोकसभा निवडणूक नेमकी कधी असणार आहे? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. तर एएनआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार शनिवारी दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाणार असल्याचे म्हटले गेले आहे. निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच एक वक्तव्य केले होते की, दोन दिवसात आचारसंहिता लागू शकते. त्याचप्रमाणे घडत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम आणि काही विधानसभा यांची घोषणा 16 मार्चला केली जाणार आहे. त्यामुळे 16 मार्चपासून लोकसभा निवडणूकचा बिगुल वाजणार यात काहीही शंका नाही. या कार्यक्रमानंतर निवडणुकीच्या राजकीय लढाइचे टप्पे जाहीर होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांनी तिसरी टर्म ही आमचीच असेल, असा दावा केला आहे. तर यावेळी आम्ही मोदींना पंतप्रधान होऊ देणार नाही, असं इंडिया आघाडीने म्हटलं आहे. आता निवडणूक आयोग कुठे आणि कधी टप्पे जाहीर करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.