शबनम न्यूज , प्रतिनिधी :
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव आळंदी जि. पुणे. या ठिकाणी बी.बी.ए. (सी.ए.) विभागाच्या वतीने तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन व प्रा. प्रेरणा पाटील यांच्या गणेश वंदनेच्या स्वागत गीताने झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना बी.बी.ए. (सी.ए.) विभागाचे प्रमुख प्रा.शाहूराज येवते यांनी बी.बी.ए. (सी.ए.) या कोर्सचे महत्व सांगून हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत या संदर्भात भाष्य करून तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी माहिती तंत्रज्ञानामध्ये (IT) मध्ये असंख्य अश्या नवनवीन संधी उपलब्ध आहेत. ज्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये माहितीचे व्यवस्थापन आणि प्रक्रिया करण्याच्या सर्व पैलूंचा समावेश होतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे स्किल आहे अश्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळविणे काही कठीण नाही असे मत व्यक्त केले. सदर प्रसंगी बी.बी.ए. (सी.ए.) विभागातील सर्व प्राध्यापकांचा तसेच तृतीय वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचा मनोभावे सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हंसराज थोरात यांनी मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थ्यांनी सज्जन असले पाहिजे तसेच प्रत्येकांचा व्यवहार हा चांगला असला पाहिजे तरच आपण जागतिक स्पर्धेच्या युगात स्थान निश्चिती करू शकतो असे मत व्यक्त करून सध्याच्या काळात विद्यार्थ्यांचा भावनिक बुद्ध्यांक कमी असून हा बुद्ध्यांक वाढविण्यासाठी शिवखेरा व संदीप माहेश्वरी यांचे साहित्य व व्हिडिओ बघितल्यानंतर निश्चितच फायदा होऊन यशस्वीतेकडे भरारी घेता येईल या संदर्भात विवेचन केले. प्रत्येक माणसाने आपल्या मध्ये असलेला अहंकार नष्ट केला पाहिजे कारण ज्या ठिकाणी अहंकार संपतो त्या ठिकाणापासून आयुष्याला खरी सुरुवात होते तसेच जीवनात चिकाटी,सातत्य असेल तर निश्चितच यश प्राप्त होते या संदर्भात विविध उदाहरणांचे दाखले दिले. ज्यावेळी विद्यार्थ्यांना इप्सित संधी मिळेल तेंव्हा महाविद्यालयाला न विसरता आयुष्यभर संपर्क ठेवला पाहिजे असे मत मांडून तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना उज्वल भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा.श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी डॉ.पांडुरंग मिसाळ,प्रा.संजीव कांबळे,डॉ. छाया जोशी,,प्रा.कैलास अस्तरकर,प्रा.दिलीप बारी,प्रा.परमेश्वर भत्ताशे प्रा. रोहित कांबळे, प्रा.महेश म्हसागर श्री.प्रवीण भावे,प्रा.सविता मानके प्रा.यशोदा आनेराव,प्रा.प्रेरणा पाटील, प्रा.सोनाली अभंग, प्रा.माधुरी चौधरी,प्रा.पूजा खवले, प्रा.पूजा मिटकरी, प्रा.सुरेखा व्यवहारे,सौ. वर्षा ताजणे, श्री. वैभव बडवे,श्री.श्रीकांत कांबळे इत्यादी विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि बी.बी.ए. (सी.ए.) विभागातील सर्व विद्यार्थीउपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.श्रावणी झोडगे व कु.प्रफुल रोकडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. सोनाली अभंग यांनी मानले सदर कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.माणिक कसाब यांनी दिली.