शबनम न्युज | पुणे
भारती अभिमत विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेजने आयोजित केलेल्या न्या.भगवती इंटरनॅशनल मुट कोर्ट कॉम्पिटिशनला चांगला प्रतिसाद मिळाला असून सहभागी ५० संघांपैकी ८ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.दि.२२ मार्च रोजी ही फेरी पार पडली.स्पर्धेचे हे १२ वे वर्ष आहे.एड.अलोक मिश्रा,सचिन डागा,गौतमबाला नंदेश्वर,एड.जीविका जॉली,एड.शुभम मिश्रा,आदित्य चौहान,तुरब काझमी,एड.अभिषेक मिश्रा यांनी परीक्षण केले.प्राचार्य डॉ.उज्वला बेंडाळे,प्रा.शिवांगी सिन्हा यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्या.पी.एन.भगवती यांच्या योगदानाच्या स्मरणार्थ २०११ साली सुरु करण्यात आली.राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर ही स्पर्धा नावाजली आहे.मानवी हक्कांच्या संदर्भातील राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय कायद्यांबद्दल या स्पर्धेतून जागृती घडवून आणली जाते.आजवर भारती विद्यापीठाचे संस्थापक कै.डॉ.पतंगराव कदम,कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,कार्यवाह डॉ.विश्वजित कदम,कार्यकारी संचालक डॉ.अस्मिता कदम-जगताप,कुलगुरू डॉ.विवेक सावजी यांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले.
कॉम्पिटिशन चे उदघाटन दि.२१ मार्च रोजी झाले.श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्या.एस.थुराईराज,अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचे न्या.ए.आर.मसूदी,भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विवेक सावजी,कुलसचिव जी.जयकुमार,भारती विद्यापीठ विधी शाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ.उज्वला बेंडाळे हे मान्यवर उदघाटन समारंभासाठी उपस्थित होते.