शबनम न्युज | पिंपरी
समाजातील अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, चालीरीती यामुळे गरीब, शोषित, महिला वर्ग, शेतकरी आणि कष्टकरी बहुजन समाज पिळवटून निघाला होता. या पीडित, वंचित समाजामध्ये साक्षरतेचा प्रकाश निर्माण करून त्यांना सत्याचा मार्ग दाखविण्याचे महान कार्य क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले, अशा शब्दांत उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले.
उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, सागर बिरारी, रमेश वाणी, दिलीप चौगुले, अशोक गडे, मनोज ब्राह्मणकर, सखाराम ढाकणे, विजय रोकडे, रोहित काटे, अनिल कापसे, ऋषिकेश होणे, ऋषिकेश चांदणे, नीरज भोसले, गजानन तायडे, रमेश पूजरा, निखिल खामकर, महेश गवस, विवेक भिसे, अनिकेत वाघमारे, ओंकार कोलते आदी उपस्थित होते.
याप्रसंगी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन करताना संजय भिसे म्हणाले की, १९वे शतक हे प्रबोधनाचे शतक मानले जाते. याच शतकात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. महात्मा फुले यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचा विचार सर्वप्रथम मांडला. ते केवळ बोलके सुधारक नव्हते तर कर्ते समाजसुधारक होते. भारतीय समाजाच्या दाहक वास्तवातून त्यांचा सामाजिक विचार उभा राहिला. त्यांचे हे कार्य राष्ट्र उभारणीच्या जडणघडणीसाठी प्रेरणादायी ठरले.